महाराष्ट्र

Nana Patole : संजय गायकवाडांनी केलेल्या कारनाम्याने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा धोक्यात

Monsoon Session : कायदा हातात घेण्याची परंपरा महाराष्ट्रासाठी अपमानास्पद

Post View : 44

Author

राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी जेवणाच्या गुणवत्तेवरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणी केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय तापमानही जोरात वाढू लागले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा राजकीय वाद पुन्हा एकदा तापला आहे. आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या निकृष्ट जेवणावरून उठलेली टीका आता शासकीय वादावर रूपांतरित झाली आहे. गायकवाडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. जर आमदारांना अशा प्रकारचे जेवण मिळत असेल, तर सामान्य नागरिकांना काय मिळत असेल? असा सवाल त्यांनी केला आहे. गायकवाडांनी जेवणाच्या गुणवत्तेबाबत केलेली टीका गंभीर आहे. त्यामुळे निवासातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकारणात सतत चर्चेत राहणाऱ्या गायकवाडांचा हा प्रकार सरकारच्या प्रतिष्ठेला कसा स्पर्श करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गायकवाडांच्या या वादाला आता नवा आयाम काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. त्यांनी संजय गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सरकारमध्ये काय सुरू आहे हे सर्वश्रुत आहे. आमदारांनी कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारची बदनामी केली आहे. या प्रकरणामागे फडणवीसांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा प्रश्न निर्माण होतो, असे पटोले यांनी विधानसभेत नमूद केले. पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून गुंडाराज सुरू झाला आहे.

Parinay Fuke : कालव्यातून वाहतोय श्रमिकांचा घाम पण मिळत नाही न्याय

सरकारवर गुंडाराज आरोप

कायदा हातात घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी योग्य नाही. नाना पटोले म्हणाले, सरकारचे आमदार असोत किंवा मंत्री असोत, त्यांना सत्तेचा माज झाला आहे. सामान्य माणसांवर अत्याचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कॅन्टीनमध्ये काही गडबड असेल, तर कायदेशीर मार्गाने कारवाई करा. मारहाण करण्याची गरज काय? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मुंबईतील टोल नाक्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दाही उभा केला. त्यांनी म्हटले की, हलक्या वाहनांना आणि शासकीय बससेवांना टोल माफी देण्याच्या नावाखाली खासगी कंत्राटदाराला नियमबाह्यपणे मुदतवाढ दिल्यामुळे राज्याला तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्य सचिव आणि अन्य उच्च अधिकार्‍यांविरुद्ध विधानसभेत विशेषाधिकार भंगाची सूचना देखील दिली आहे.पटोले म्हणाले, मंत्रिमंडळाच्या निर्णयात नुकसानभरपाईचा उल्लेख आहे. पण संबंधित कंत्राटदाराने कोणतेही आकडे दिलेले नाहीत. ज्यामुळे मंत्रिमंडळाची दिशाभूल झाली आहे. खासगी कंपनीला बेकायदेशीर फायदा मिळाला आहे.राजकीय वातावरणात आता संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन वादाचा फारच मोठा रंगरंगोट रंगायला सुरू झाला आहे. या प्रकरणात पुढील कारवाई आणि सरकारची भूमिका काय असेल हे सध्या पाहण्यासारखे ठरणार आहे. एकीकडे जेवणाच्या गुणवत्तेचा प्रश्न, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांवर गुंडाराजाचा आरोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलेले दिसत आहे.

Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी खासदार उतरले रस्त्यावर

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!