महाराष्ट्र

Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा झाला अंत

Municipal Elections : सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीला दिला रक्षक

Author

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

साहेबानं मेहरबान, कदरदान, महाराष्ट्रात पुन्हा उभारणार राजकीय रणसंग्राम. कारण आहे गेले अनेक वर्ष रखडलेली  स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक. या  निवडणुकीला अखेर हिरवा कंदील मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार महिन्यांत निवडणूक घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल कधीही वाजू शकतं.  या निवडणुकीची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून सुरू होती.

गेल्या पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकीला वारंवार स्थगिती येत होती. मात्र आता न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी सुरू राहीलच. पण त्याआड निवडणूक रखडू नयेत. त्यामुळे स्थानिक लोकशाहीला नवसंजीवनी मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून तात्काळ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत प्रत्येकाला आगामी निवडणुकीसाठी उत्साह आणि उत्सुकता तितकीच आहे.

Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार

महायुतीत गोंधळ संपला

पक्षांनी आपापले रणसंग्राम सज्ज करत, कंबर कसायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मागील चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सातत्याने टळत होत्या.  त्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आवाजाला गालबोट लावले. एकाधिकार शाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला ठसा ठरवणाऱ्यांनी अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक  घेण्याच्या तयारीला प्रारंभ केला आहे.

न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयावर अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. ते म्हणाले, राज्याच्या लोकशाहीला चालढकल करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात सर्वांना दिलासा देणारा आहे. मात्र महायुतीच्या अंतर्गत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कुरबुरींमुळे एकत्र लढण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा संपवताना मोठा खुलासा केला आहे.

subsidy scam : न्यायाच्या विभागातच अन्यायाचा बाजार

पक्षसंघटनांची धावपळ सुरू

महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे असे त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे या वक्तव्याला अधिकृततेचा आणि गंभीरतेचा साज चढला. स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रित रणनीती आखत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी आपल्या संघटनांना सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर पक्षांच्या तोंडावर जनतेच्या प्रश्नांचे धगधगते मुद्दे असतील. या निकावडणुकीमुळे राज्यातील राजकीय नकाशा नव्यानं रंगवला जाणार, इतकं मात्र नक्की. कुणी गढ राखणार, कुणी नव्याने उदयास येणार, याचा थरार आता हळूहळू वाढू लागलाय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!