प्रशासन

Maharashtra : एचएसआरपी लावायची अंतिम घंटा वाजली

HSRP : वाहनधारकांना परिवहन विभागाचा मोठा इशारा

Author

राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी तिसरी मुदतवाढ दिली आहे.

वाहनधारकांनो, तुमच्या जुन्या वाहनांना High Security Registration Plate म्हणजेच HSRP लावण्याचा वेळ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे. ही कालमर्यादा संपल्यानंतर, HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही HSRP लावलेले नाही, तर त्वरित कारवाई करा आणि नियमांचे पालन करा. राज्यात सुमारे 2 कोटी जुने वाहनं आहे.  त्यापैकी आतापर्यंत केवळ 23 लाखांना HSRP बसवण्यात आले आहे.

40 लाखांहून अधिक वाहनधारकांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु अजूनही सव्वा कोटी वाहनं HSRP बाहेर आहेत. याच काळात, 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या नव्या वाहनांना डीलरकडूनच HSRP बसवण्यात येत आहेत. यामुळे जुन्या वाहनधारकांसाठी ही अंतिम संधी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.तरीही, HSRP साठी अर्ज केल्यानंतरही अनेक जुन्या वाहनधारकांना नंबर प्लेट उपलब्ध होत नाही, असे प्रतिपादन झाले आहे. HSRP तयार करणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा मंदावल्याने अनेक फिटमेंट केंद्रे बंद पडली आहे. ज्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Amruta Fadnavis : फडणवीसांचं योगतत्त्व अमृतांच्या शब्दांत 

कंपन्यांची भूमिका महत्त्वाची

राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनीही या समस्येवर प्रकाश टाकून सांगितले की, संबंधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात HSRP तयार करण्यासाठी त्वरित सूचना देणे गरजेचे आहे. ज्यामुळे HSRP उपलब्धता सुनिश्चित करता येईल.राज्यातील 60 प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तीन मंडळांमध्ये विभागले गेले आहे. त्यांच्यासाठी तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड आणि मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या कंपन्या एकत्र येऊन HSRP त्वरित आणि नियमित पुरवठा सुनिश्चित करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

High Security Registration Plate ही भारत सरकारने वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अनिवार्य केली आहे. या नंबर प्लेटमध्ये एक खास सिरीयल नंबर आणि न काढता येणारा लॉक असतो, ज्यामुळे चोरी, बदल किंवा गैरवापर करणे शक्य नाही. एचएसआरपी मुळे वाहनांची ओळख पटविणे सोपे होते. वाहन ट्रॅकिंगसाठीही याचा मोठा उपयोग होतो.भारतामध्ये नवीन तसेच जुन्या सर्व वाहनांसाठी HSRP अनिवार्य आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनावर HSRP लावणे ही जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे. अधिक सुरक्षित आणि नियमानुसार वाहन चालविण्याच्या दृष्टीने HSRP ही एक महत्वाची पाऊल आहे.

Nitin Gadkari : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी दिला ‘बांबू मंत्र’

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!