महाराष्ट्र

माझा संबंध राहिलेला नाही, असं का म्हणाले Sudhir Mungantiwar

उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नाराजीच्या चर्चेवर भाष्य

Author

पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. त्यावरून मंत्रीपद न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाले आहेत. पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीत वाद निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेतील नेते नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून प्रखर विरोध दर्शवित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेबाबत राज्याची माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

महायुतीतील शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळालेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले तर नाशिकचे पालकमंत्री पद दादा भुसे यांना न मिळाल्यानं शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे गटाच्या नाराजीची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मनगंटीवार यांनी वक्तव्य केले आहे.

दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला Devendra Fadnavis यांनी दिली स्थगिती

संपर्क साधतील BJP नेते

पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असतील तर त्याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असतील तर भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याशी संपर्क साधुन चर्चा करतील. माझा दुरान्वये संबंध ना उत्तराशी आहे, ना कृतीशी आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिपद न मिळाल्यानं या विधानातून सुधीर मुनगंटीवार यांचीही नाराजी दिसून आली आहे.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही, हे मी आपण समजायचं. आता आपला थेट असा संपर्क राहिलेला नाही. आपण एक आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचा संकल्प घेतला आहे. जनतेची कामं करीत आहोत. एकनाथ शिंदे नाराज असतील तर भाजपचे नेते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करतील. आपला दुरान्वये संबंध ना उत्तराशी आहे ना कृतीशी आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, .. तरीही माझी बदनामी

मुंडेंना लगावला टोला

मंत्री धनंजय मुंडे यांनी शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्याकडे जी माहिती आहे, ती माहिती ते कधीतरी देत असतात. खरं तर आता त्या पहाटेच्या शपथविधीचे औचित्य राहिलेले नाही. पहाटेच्या शपथविधीचे कवित्व आता समाप्त झाले आहे. आता आम्ही एकत्र आहोत. नवीन सरकार आलं आहे, असं सुधीर मनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेने सिद्ध करून दिले आहे. आता शपथविधीच्या संबंधात जुन्या आठवणी काढून आणि भाष्य करून कोणाचाही फायदा होत असेल, असे मला वाटत नाही. अनेक लोक जेव्हा बोलणं गरजेचे असते तेव्हा ती बोलतच नाही. नंतर ते कधीतरी आत्मचरित्र लिहितात. हे मला माहीत होतं, असं ते लोक सांगतात. या पहाटेच्या शपथविधीवर खरा देशभक्त, राष्ट्रभक्त, पक्षभक्त तोआहे, खरा निष्ठावंत तोच आहे, जो जेव्हा वाईट आहे, तेव्हा तो जाहीरपणे सांगतो. जर भीतीमुळे तेव्हा तुम्ही सांगितलं नाही, तरी याला काय अर्थ आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!