महाराष्ट्र

ऑपरेशन शिवधनुष्यवरून Uday Samant यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन 

भविष्यात Ratnagiri मध्ये 70 हजारांवरून 17 आणणार मतांवर आणणार 

Author

राज्यात सध्या “ऑपरेशन शिवधनुष्य” जोरात सुरू असून रत्नागिरीतून याची भव्य सुरुवात करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जबर धक्का देत त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधत त्यांना कडाडून प्रत्युत्तर दिले.

मंत्री सामंत म्हणाले, “उबाठा गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या गटाला सोडून शिवसेनेत येत आहेत. भविष्यात रत्नागिरी विधानसभेतील ‘उबाठा’ची ७० हजार मते १७ हजारांवर आणण्याचे आव्हान आम्ही पेलणार आहोत.

रत्नागिरीत ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ची दमदार सुरुवात

रत्नागिरीत शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाची मोहिम सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

अपात्र महिलांनी Ladki Bahin Yojana लाभ सोडण्याचे आवाहन

सामंत म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी आता एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील नेतृत्वावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि इतर निवडणुकांमध्ये दोन तृतीयांश बहुमताने विजय मिळवणे हे आपले ध्येय आहे.

‘उबाठा’च्या राजकीय अस्तित्वाला मोठा धोका

उदयन सामंत यांनी उद्धव ठाकरे गटावर आरोप करताना म्हटले की, “गद्दारीमुळे ‘उबाठा’चा पक्ष संपुष्टात येत चालला आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना बाजूला ठेवून स्वार्थासाठी राजकारण केले. त्यामुळेच जनतेचा राग आता उबाठावर आहे. भविष्यात त्यांच्या मतांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल.”

बंड्या साळवी यांनी पक्षप्रवेशानंतर आपली भावना व्यक्त करत सांगितले, “मी गेल्या ३० वर्षांपासून शिवधनुष्याशी जोडलेलो होतो. मात्र अडीच वर्षे दूर राहिलो, ही चूक होती. आता पुन्हा एकदा शिवधनुष्य खांद्यावर घेतले आहे. विधानसभेत ‘उबाठा’च्या उमेदवाराला ७० हजार मते मिळाली होती, पण पुढील निवडणुकीत ती १७ हजारांवर आणण्याची जबाबदारी माझी आहे.”

शिंदे गटाचा विश्वास आणि विकासाचा वसा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाच्या धोरणांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “दावोसच्या परिषदेत रत्नागिरीसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक मंजूर केली असून, यामुळे २० हजार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवसेनेचा सळसळता उत्साह पुन्हा जागवायचा आहे. जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही आणि सक्षम नेत्यांनाच तिकीट दिले जाईल.”

कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री सामंत यांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. “आपल्या पक्षप्रमुखांचे हात बळकट करताना ग्रामीण भागांचा विकास साधायचा आहे. रत्नागिरीसह राज्यभरात शिवसेनेचा झेंडा पुन्हा उंचवायचा आहे,” असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांना सज्ज होण्याचे आवाहन केले.

शेवटी, रत्नागिरीतून सुरू झालेले ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ आता राज्यभर पोहोचणार असून, शिवसेनेला पूर्वीचा जल्लोष आणि ताकद परत मिळवून देणार, याची स्पष्ट झलक या कार्यक्रमातून दिसली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!