
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जो चुकी करेल, तो तुरुंगात जाईल.
महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या कडाका चांगलाच वाढत आहे. मात्र राजकीय वर्तुळात विविध मुद्यांवर राजकारण तापलेले दिसत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर प्रशांत कोराटकर, औरंगजेबाच्या कबरीबाबतचा वाद, तसेच नागपुरातील दंगलीबाबत अनेक चर्चिल्या गेल्या. मात्र आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेने.
कुणाल कामराने आपल्या स्टाईलमध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर व्यंगात्मक गाणे सादर केले. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून ते सत्ता स्थापनेपर्यंतच्या घडामोडींचा समावेश होता. यामुळे शिंदे गटाचे समर्थक संतप्त झाले आहेत. काहींनी कुणाल कामरावर टीका करत त्याला धडा शिकवण्याची भाषा केली, तर उद्धव ठाकरे गटाने त्याला पाठिंबा दिला आहे.

Indrajeet Sawant : न्याय मिळेपर्यंत शिवभक्त शांत बसणार नाहीत
कायद्याचे राज्य आहे
कुणाल कामरा यांच्या एका विडंबनगीतावरून सुरू झालेला वाद अद्याप शांत झालेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जो चुकी करेल, तो तुरुंगात जाईल’. सामाजिक न्यायाच्या अंतर्गत कार्यकर्ते आपले काम करतात आणि कायदेशीर प्रक्रिया त्यानुसार पुढे जाते, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी शरद पवारांच्या एका घटनेचा दाखला देत सांगितले की, ‘शरद पवार साहेबांविरोधात एका मुलीने चुकीचे म्हटले होते. त्यामुळे तिला 30 दिवस तुरुंगात डांबण्यात आले होते.
एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी अयोग्य शब्द वापरल्याने त्याला बेदम मारहाण झाली होती. मुद्द्यावरून पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ’24 ऑक्टोबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांना ‘गद्दार’ म्हणणे योग्यच आहे.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
Devendra Fadnavis : कितीही प्रयत्न करा, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
कामराची प्रतिक्रिया
कुणाल कामराने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर स्पष्ट भूमिका मांडली. “मी माफी मागणार नाही, मी कोणाला घाबरत नाही, आणि कुठेही लपून बसणार नाही,” असे म्हणत त्याने आपली ठाम भूमिका व्यक्त केली. त्याने सांगितले की, त्याच्या फोन नंबर लीक केल्याने अनेक अनोळखी कॉल्स येत आहेत, मात्र हे कॉल्स त्याच्या व्हॉईसमेलवर जातात, जिथे त्याच्या गाण्याचे रेकॉर्डिंग ऐकायला मिळते.
कुणाल कामराने दिल तो पागल है या चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर ‘ठाणे की रिक्षा’ हे विडंबन गीत तयार केले. यात कुणाच्याही नावाचा उल्लेख नसला, तरी शिवसेनेतील फुटीपासून सत्ता स्थापनेपर्यंतचे सर्व घटनाक्रम मार्मिक शब्दांत टिपले आहेत. या गाण्याने दोन्ही शिवसेनांमध्ये नवा संघर्ष निर्माण केला आहे. शिंदे गटाच्या समर्थकांनी कामराला इशारे दिले, तर उद्धव ठाकरे गटाने त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव केला.
स्टुडिओ तोडफोड
काही संतप्त कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर धडक मारून तोडफोड केल्याची घटना घडली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. शिवाय, शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी मुंबईच्या अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे.