महाराष्ट्र

Abhijit Wanjarri : संविधान कुणाच्या बापाचे नाही

Maharashtra : प्रशांत बंब यांच्या वक्तव्याने विधान परिषद तापली

Author

काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी विधानपरिषद बरखास्त करण्याच्या मागणीवरून आमदार प्रशांत बंब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या विधानामुळे विधान परिषदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

महाराष्ट्रात सध्या उन्हाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या सभागृहात खळबळ उडाली आहे. मात्र विधिमंडळाच्या नेत्याने विधान परिषद आणि सदस्यांवर आक्रमक विधान केले. या विधानानंतर नागपूरचे काँग्रेस नेते अभिजीत वंजारी आक्रमक भूमिका घेतली आहे, आणि त्यामुळे सभागृह तापले आहे.

विधान परिषदेमध्ये 25 मार्च रोजी भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरव साजरा करत चर्चा करण्यात आली. मात्र, चर्चेपूर्वी शिक्षण आणि संविधान या दोन्ही विषयांवर जोरदार गदारोळ झाला. विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांनी विधान परिषदेतील सदस्यांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप वंजारी यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील सर्व पदवीधर आणि शिक्षित आमदारांचे पद काढून टाकावे आणि विधान परिषद बरखास्त करावी, अशी मागणी केली. त्यांच्या या विधानामुळे विधान परिषदेतील आमदार भडकले, आणि त्याला सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी अभिजीत वंजारी यांनी घेतली आहे.

Nana Patole : कुंपणच शेत खात असेल, तर ते कापावे लागेल

सभागृहात गदारोळ 

विधान परिषदेमध्ये बोलतांना अभिजीत वंजारी यांनी प्रशांत बंब यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘संविधान हे प्रशांत बंबच्या बापाचे नाही तसेच विधानमंडळही कुणाच्या मेहरबानीवर चालत नाही’ त्यांच्या या रोखठोक वक्तव्यामुळे संपूर्ण सभागृहाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले.

प्रशांत बंब वारंवार शिक्षक संघटनांवर हल्ला करतात. त्यांना अशी हिंमत कुठून येते? त्यांनी त्वरित संपूर्ण सभागृहाची माफी मागावी, अन्यथा आम्ही चर्चा पुढे जाऊ देणार नाही, असेही वंजारी यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात एकप्रकारचे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिषदेचा इतिहास

अभिजीत वंजारी यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘विधान परिषद ही विधानसभेपेक्षा आधी अस्तित्वात आली होती. विधानसभेतून परिषदेची निर्मिती झालेली नाही; असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा, शिक्षकांचा आणि विधान परिषदेचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही ते बोलले.

उत्तर देताना सरकारच्या वतीने दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की 24 मार्च रोजी शालेय शिक्षणावर चर्चा करताना प्रशांत बंब यांनी हे विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांना ही बाब कळवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!