महाराष्ट्र

Narendra Modi : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संघ आणि दीक्षाभूमीला भेट

Vidarbha : नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा 

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. संघ मुख्यालयाला ते 2014 नंतर प्रथमच भेट देणार आहेत. तसेच, दीक्षाभूमीवरही त्यांची उपस्थिती राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागपूर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 नंतर प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्याचबरोबर, दीक्षाभूमीवरही ते आपली उपस्थिती नोंदविणार आहेत. या दौऱ्याने राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय उभा केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची मोठी चर्चा राजकारण आणि संघाशी संबंधित असलेल्या दृषटिकोनातून सुरू झाली आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नागपूरचा अनेकदा दौरा झाला असला तरी, संघ मुख्यालयात त्यांनी कधीच भेट दिली नव्हती. त्यामुळे अनेक तर्क आणि राजकीय चर्चांनंतर आता मोदी हे संघ मुख्यालयात जाऊन या चर्चांना पूर्णविराम देणार आहेत. पंतप्रधान मोदींचा दौरा सुरू होण्यापूर्वी नागपूर पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने त्याच्या संपूर्ण दौऱ्याची तयारी केली आहे.

Rahul Gandhi : शिक्षण आरएसएसच्या ताब्यात गेलं, तर देश उद्ध्वस्त होईल

मुख्यालयाला भेट 

पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यात विशेष महत्त्व असलेली गोष्ट म्हणजे त्यांचा रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथील कार्यक्रम. या ठिकाणी संघाच्या इतिहासाचा गौरव आणि तिथल्या कार्याची महत्वाची जागा आहे. तसेच, दीक्षाभूमी येथे पंतप्रधान मोदींची उपस्थिती निश्चितपणे नागपूर आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्ष्यात एक महत्त्वपूर्ण वळण ठरेल.

नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोदी यांच्या प्रत्येक भेटीचे विश्लेषण होत राहिले आहे, आणि यापूर्वीही त्यांच्या एका निवडणूक प्रचार सभेत त्यांनी नागपूरच्या उन्हाला लेकरून एक मिश्कील टिपण्णी केली होती. त्यावेळी मोदी यांनी नागपूरच्या हवामानावर हसून टिप्पणी केली होती. परंतु या वेळी मोदींच्या संघ मुख्यालय भेटीला एक वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीला संघाच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून एक मजबूत राजकीय संदेश दिला जातो.

भविष्यातील लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याचे महत्व राजकारणाशी अधिक संबंधीत आहे. भाजप आणि संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठे निर्णय घेतले आहेत आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची राजकीय दिशा निश्चित होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांत दिसून येतो. पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे संघ आणि भाजप यांचे संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे, आणि आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणावर याचा प्रभाव पडेल, हे निश्चित आहे. मोदी यांची आगामी नागपूर भेट एक महत्त्वाचा क्षण ठरू शकते, ज्यामुळे राज्यातील राजकीय दृश्यात नवा अध्याय रचला जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!