महाराष्ट्र

Girish Mahajan : वीर जवानाला श्रद्धांजली देताना गंभीर जखमी

Jalgaon : मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये चढताना डोक्याला लागली लोखंडी रॉड

Author

जळगावमध्ये वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला मिलिटरी ट्रकचा लोखंडी रॉड लागून गंभीर दुखापत झाली.

जळगावातील वरणगावमध्ये देशसेवेसाठी प्राणार्पण केलेल्या वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अनपेक्षितपणे अपघातग्रस्त झाले. जवानाच्या अंतिम दर्शनासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये चढताना त्यांच्या डोक्याला लोखंडी रॉड जोरात आदळला. या धक्क्याने ते क्षणभर गोंधळले, मात्र रक्तस्राव सुरू असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यावर ठाम राहून वीर जवानाला मानवंदना दिली.

घटना घडताच, उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी आणि शेख आखलाक यांनी तातडीने त्यांना उपचार घेण्याचा आग्रह धरला. अखेर, गिरीश महाजन जखमी अवस्थेतच निमजाय हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉक्टर निलेश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत मंत्री महाजन उपचारानंतर तातडीने जवानाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रवाना झाले.

Prakash Ambedkar : रक्ताने माखलेल्या हातांची इफ्तार भेट

कुटुंबीयांचे सांत्वन

रक्तस्राव सुरू असतानाही, गिरीश महाजन यांनी अंत्ययात्रेत पायी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तिरंगा सर्कलपर्यंत पायपीट करत त्यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या शौर्याला सलाम केला. त्यांच्या या समर्पण वृत्तीने वरणगावकरांची मने जिंकली. शेकडो नागरिकांनी त्यांच्या जिद्दीची प्रशंसा केली.

घटनेनंतर, मंत्री महाजन यांनी जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. देशसेवेसाठी आपल्या मुलाने प्राण दिले, हे मोठे बलिदान आहे. राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे, असे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. अशा कठीण प्रसंगीही कर्तव्यावर ठाम राहण्याची त्यांची जिद्द कौतुकास्पद ठरली.

Harshwardhan Sapkal : दाल मे काला नही, ‘संपूर्ण डाळच काळी’

अखेरचा निरोप

वरणगाव तालुका भुसावळ येथील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर हे अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावत असताना 24 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने शहीद झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. भारतीय लष्करात 15 वर्षे सेवा केलेल्या या वीर जवानाच्या पार्थिवावर 27 मार्च रोजी वरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कार वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. सैनिकांनी मानवंदना देत, बंदुकीच्या फैरी झाडून शहीद अर्जुन बावस्कर यांना अखेरचा निरोप दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!