महाराष्ट्र

Amravati : जयस्तंभ चौकात थरार, दुकानात घुसून झाडल्या गोळ्या 

Gun Firing : फायरिंगनंतर पोलिसांचा ॲक्शन मोड 

Share:

Author

अमरावती शहराच्या जयस्तंभ चौकात 4 एप्रिल शुक्रवारी रात्री तीन अज्ञात तरुणांनी ‘जय भोले पान सेंटर’मध्ये घुसून देशी कट्ट्याने गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जयस्तंभ चौकात शुक्रवारी रात्री झालेल्या फायरिंगच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘जय भोले पान (गुटखा) सेंटर’मध्ये तीन अज्ञात तरुणांनी देशी कट्ट्याने गोळीबार करून दहशत निर्माण केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच अमरावती शहराचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोहर कोटनाके आणि गुन्हे शाखेचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत घटनास्थळी उपस्थित व्यवसायिक आणि कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे जयस्तंभ चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

BJP : महाराष्ट्रात पक्षाची सदस्यसंख्या दीड कोटीवर

घटनेचा थरार 

जयस्तंभ चौकाजवळील ‘जय भोले पान मटेरियल सेंटर’मध्ये शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास गुरुबक्ष मंगलानी, सागर मंगलानी आणि छुटलानी नामक कर्मचारी उपस्थित होते. याचवेळी तीन अज्ञात तरुण मोपेडवर येऊन दुकानात शिरले. त्यांनी “वो कहा है?” असं म्हणत गुरुबक्ष मंगलानी यांच्याशी वाद घातला आणि त्यानंतर एकाने देशी कट्टा काढून गोळीबार केला. सुदैवाने गोळी दुकानातील फर्निचरला लागली. नंतर आरोपींनी दुकानाच्या काचा फोडून तोडफोड केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराच्या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक काळतूस जप्त केले आहे. वेगवेगळ्या दिशांना पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

फायरिंगमागे प्रॉपर्टी वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. विकी मंगलानी हे प्रॉपर्टी व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी किंवा खंडणीसाठी ही घटना घडवण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सागर मंगलानी यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

भीतीच वातावरण

घटनेनंतर जयस्तंभ चौक व परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी फायरिंग होणं हे कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठं आव्हान असल्याने पोलिसांकडून अधिक सतर्कतेने तपास सुरू आहे. डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कार्याची माहिती घेतली असून शहरात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!