महाराष्ट्र

Amol Mitkari : गरीबांचा जीव घेणाऱ्या राक्षसांना धडा शिकवू

Maharashtra : राज्यभरात शोषण करणाऱ्या मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रतिकृती

Author

आमदार अमोल मिटकरी यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तीव्र टीका करत, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या प्रतिष्ठित रुग्णालयावर गंभीर आरोप होत आहेत. प्राथमिक उपचार मिळण्याआधीच दहा लाख रुपये भरण्याची सक्ती केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. अकोल्याची आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर संतप्त व्यक्त केलेला आहे.

राज्यभरातून तीव्र प्रतिसाद उमटू लागला आहे. अनेक नेत्यांनी रुग्णालय प्रशासनावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हे फक्त पुण्यात घडलेले प्रकरण नाही, तर संपूर्ण राज्यभर अशा घटना घडत आहेत. मंगेशकर हॉस्पिटलसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्येही गरिबांचे शोषण होत आहे. सरकारी योजना कागदावरच आहेत आणि गरिबांना त्याचा फायदा मिळत नाही. आता या राक्षसांना धडा शिकवायची वेळ आली आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

Amravati : जयस्तंभ चौकात थरार, दुकानात घुसून झाडल्या गोळ्या 

रुग्णालयात तोडफोड

संतापाचा परिणाम असा झाला की, काही संतप्त जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. सामाजिक न्याय आणि आरोग्यसेवेच्या अपुऱ्या व्यवस्थेवर यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रतिष्ठित आहे. या संस्थेने अनेक लोकांची सेवा केली आहे. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी एका गर्भवती महिलेला त्वरित उपचार न देता दहा लाखांची मागणी केली, ही बाब अक्षम्य आहे. अशा असंवेदनशील वागणुकीला कोणत्याही परिस्थितीत माफ करता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना त्वरित उपचार मिळतील का, की पैशांसाठी त्यांचा जीव धोक्यात टाकला जाईल, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे आरोग्यसेवा ही फक्त श्रीमंतांसाठी आहे का. या घटनेनंतर राज्यातील नागरिक आणि सामाजिक संस्था आता या प्रश्नावर आवाज उठवत आहेत. भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

BJP : महाराष्ट्रात पक्षाची सदस्यसंख्या दीड कोटीवर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!