
शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर राजकीय प्रतिक्रिया उतरायला सुरुवात झाली आहे. यावर आता अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ. एकमेकांपासून तुटलेले नेते पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या, की राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात होतेच. असंच काहीसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांबाबत सध्या पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील अलीकडील भेटी आणि एकत्रित उपस्थितीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. यावर आता नेत्यांचे राजकीय पडसाद उतरायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर सूचक विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वातील गट सत्तेत असून महायुतीमध्ये सामील आहे. तर शरद पवार यांचे नेतृत्व असलेला गट महाविकास आघाडीत विरोधी बाकांवर आहे. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे एकाच मंचावर आले. या तीनही नेत्यांचे संस्थेशी जुने संबंध आहेत आणि ते त्याचे संचालकदेखील आहेत. या भेटींवर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, खुर्ची जवळ खुर्ची असली तरी शिक्षण, सहकार आणि राजकीय आखाडा वेगळा असतो, असं म्हणत त्यांनी राजकीय संभावनांना थोडंसं वेसण घालण्याचा प्रयत्न केला.

Amrit Bharat Station Scheme : अमरावतीच्या रेल्वे स्थानकाचा होणार मेकओव्हर
प्रफुल पटेलांच विधान
मिटकरी यांच्या म्हणण्यावरून असं स्पष्ट होतं की, या भेटी केवळ संस्थात्मक आणि औपचारिक स्वरूपाच्या होत्या. मात्र, पवार घराण्याच्या राजकीय भूतकाळ आणि आताच्या घडामोडी पाहता, अशा भेटी एकमेकांतील संबंध सुधारण्याचा संकेत देत असतील, असंही म्हटल्या जात आहे. मात्र, जय पवार यांच्या लग्नप्रसंगी झालेल्या सौहार्दपूर्ण भेटीने आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत काका-पुतण्याची पुन्हा एकत्र उपस्थितीमुळेही राजकीय चर्चांना नवा उधाण आला आहे.
खासदार प्रफुल पटेल यांनीही यावर स्पष्टपणे म्हटलं आहे की, शरद पवार आणि अजित पवार जर महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येत असतील आणि त्यातून शरद पवारांच्या अनुभवाचा उपयोग होणार असेल, तर त्यात काहीही गैर वाटण्यासारखं नाही. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा गरम झाल्या आहेत. पटेल यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, हे विधान केवळ एकमताचे समर्थन नाही तर संभाव्य राजकीय समीकरणांची तयारी असल्याचा संकेत देखील देतं.
Education Department : विदर्भातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल