
नुकत्याच सुरू झालेल्या अमरावती विमानसेवेच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विमानतळाचे नाव बदलण्यासाठी मागणी शरदचंद्र पवार गटाकडून केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा जल्लोषात पार पडला. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि भाजपचे अनेक कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यामुळे अमरावतीकरांचा अभिमान उंचावला असला, तरी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळाच वाद निर्माण झाला विमानतळाच्या नावावरून सुरु झालेला संभ्रम. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी अमरावती विमानतळाचे नामकरण डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
अमरावती विमानतळाचे औपचारिक नामकरण अद्याप झालेले नाही. उद्घाटनाच्या दिवशी एमएडीसी (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी) कंपनीने व्हिडीओ स्क्रिनवर प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असे नाव झळकले. हा उल्लेख पाहून उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि गोंधळ दोन्ही निर्माण झाले. कारण सरकारकडून कोणताही अधिकृत निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांना सलील देशमुख त्यांनी यासंदर्भात पत्र लिहून विनंती केली आहे.

Devendra Fadanvis : आपले सरकारवर विलंब केल्यास खिशाला बसणार चाट
शरद पवारांचा पाठपुरावा
सलील देशमुख म्हणाले की विदर्भाच्या मातीतून उगम पावलेले आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. पंजाबराव देशमुख हे देशाचे पहिले कृषिमंत्री होते. त्यांच्या नावावर विदर्भ कृषी विद्यापीठाचे नामकरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्याच नावाने विमानतळ असणे हा त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरेल. या संदर्भात सलील देशमुख यांनी एक महत्त्वाची आठवण देखील सांगितली. नागपूर येथील विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी समोर आली होती. तेव्हा शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.
शरद पवार यांनी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्याच पद्धतीने अमरावतीसाठीही आता ही नामकरणाची मागणी प्रबळ झाली आहे. सलील देशमुख यांच्या मते, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव दिल्यास शेतकरी नेत्याचा खरा गौरव होईल. त्याचबरोबर विमानसेवेच्या माध्यमातून कृषिमालाची वाहतूकही परदेशात करता येईल. याचा थेट फायदा अमरावती व परिसरातील शेतकऱ्यांना होईल. अमरावती विमानतळावरुन नुकतीच प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाचे अधिकृत नामकरण ही एक गरज बनली आहे.
https://thelokhitlive.com/workshop-organized-in-bhandara-and-gondia-for-lake-desilting-and-planning-under-initiative-of-parinay-fuke/
लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. या विमानतळाचे खरे नाव नेमके कोणते? तर अमरावती विमानतळाचा विकास होत असतानाच, त्याचे नाव कोणाचे होणार यावरून राजकीय घमासान सुरू झाले आहे. प्रशासनाचा अधिकृत निर्णय अद्याप बाकी आहे. समारंभात वापरलेले नाव आणि विरोधी पक्षाने मांडलेली मागणी यामुळे या मुद्द्याने गती घेतली आहे. आता पाहावे लागेल की अंतिम निर्णय काय होतो आणि अमरावतीच्या आकाशात कोणत्या नेत्याच्या नावाने उड्डाण घेते.