
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या आमदार भावना गवळी सध्या यवतमाळमध्ये कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.
2024 हे वर्ष महाराष्ट्रातील राजकीय पटलावर मोठ्या उलथापालथीचं ठरलं. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धक्का बसला. काँग्रेसने मात्र आपली ताकद पुन्हा एकदा मजबूत केली होती. पण ही ताकद जास्त काळ टिकू शकली नाही. विधानसभा निवडणूक समोर आली. तेव्हा महायुतीने काँग्रेसवर मात करत पुन्हा सत्तेची सूत्रं आपल्या हातात घेतली. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या भावना गवळी.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन टर्म खासदार म्हणून गवळी निवडून आल्या होत्या. 2024 निवडणुकीमध्ये पक्षाकडून उम्मेदवारी नाकारण्यात आली होती. गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यांचे खासदारकी रद्द करत त्यांना आमदारकीच्या रिंगणात उतरवलं गेलं. त्यात त्या विजयी झाल्या खऱ्या, पण कुठेतरी गवळींचं कार्यक्षेत्र यवतमाळहून वाशिमकडे वळल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

पक्षांतर्गत नाराजी
निवडणुकीपूर्वी त्या कुठेतरी गायब असल्याचे संकेत होते. यामुळे अनेक शिवसैनिक त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. यामुळे पक्षातही अंतर्गत वाद उफाळून आले. पूर्वी त्या यवतमाळमध्ये सक्रीय होत्या. मात्र अचानक त्यांच्या उपस्थितीत खंड पडला. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला नसल्याने त्यांना लोकसभेऐवजी विधानपरिषदेमध्ये संधी देण्यात आली. गवळी यांच्यावर काम प्रायव्हेट लिमिटेड पद्धतीनं करण्याचा आरोप आहे.
त्यांच्या विरोधकांनी आणि काही पक्षांतर्गत कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे. म्हणजेच, जनतेत राहून, लोकांच्या प्रश्नांवर थेट काम करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या वर्तुळात मर्यादित राहून काम केलं, असा आरोप आहे. विशेष म्हणजे, यवतमाळमध्ये जिथं त्यांनी दीर्घकाळ काम केलं, तिथं सध्या त्यांच्या अनुपसस्थितीचा अभाव जाणवत आहे. त्यांच्या कामाचा फोकस आता पूर्णतः वाशिम जिल्ह्यावर केंद्रीत झालेला आहे. वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.
25 वर्षांची लोकनाळ
वाशिम, कारंजा आणि रिसोड हे वाशिमचे तीन मतदारसंघ आहेत. गेल्या दोन निवडणुकीमध्ये वाशिम आणि कारंजा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. तर रिसोडमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले. भावना गवळींचे कार्यक्षेत्र आता या भागात वाढत असल्याचं दिसत आहे. स्वतः भावना गवळी म्हणाल्या होत्या की, मागील 25 वर्षांपासून मी वाशीम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आले आहे. माझी नाळ लोकांशी जोडलेली आहे. जर यावेळी मला उमेदवारी मिळाली असती, तर प्रचंड मतांनी विजयी झाले असते.