महाराष्ट्र

Maharashtra : बोलता बोलता घोळ; बावनकुळेंचा राष्ट्रभाषा वक्तव्यावर यूटर्न

Chandrashekhar Bawankule : देशाला गरज आहे विकासाची, भाषेवरून वादाची नाही

Author

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हटल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते. मात्र टीकेनंतर त्यांनी आपली चूक मान्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण जोर धरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेला शाळांमध्ये सक्तीच्या स्वरूपात शिकवण्याच्या निर्णयावर तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एका नवा वाद सुरू झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र त्यांचे वक्तव्य कुठेतरी चुकल्याने त्यांनी ते सुधारले आहे.

राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की, हिंदी भाषेची शिकवणी शालेय पाठ्यक्रमात अनिवार्य करणे योग्य नाही. यावर आता विविध राजकीय नेत्यांची प्रतिक्रियाही येऊ लागली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या आरंभिक वक्तव्यात हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून संबोधित केले होते. त्यानंतर त्यावर विरोधी पक्षांनी तिखट टीका केली. बावनकुळे यांना लगेचच आपल्या शब्दांची चूक जाणवली आणि त्यांनी पत्रकार परिषदेत त्याचं स्पष्टीकरण दिलं.

Ashok Uike : नागपुरातून होईल आदिवासी संस्कृतीचे भव्य गोंडवाना दर्शन

मराठीची अस्मिता कायम

बावनकुळे यांनी सांगितले की, त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा असे म्हणण्याऐवजी राजभाषा असे म्हणायचे होते. बावनकुळे यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले की, हिंदी भाषा भारताच्या राष्ट्रीय धोरणानुसार शालेय शिक्षणात समाविष्ट केली गेली आहे. मात्र याचा अर्थ मराठी भाषेची महत्त्व कमी होईल असं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राची अस्मिता ही मराठी भाषेशी जोडलेली आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, देशात विकासाच्या मार्गावर चालताना, प्रत्येक गोष्टीला राजकारणाने थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर देशात कोणतीतरी राष्ट्रीय धोरण येत असेल आणि त्यात हिंदी भाषेचा समावेश असेल, तर त्यावर इतकी राजकारणी चर्चा आणि आंदोलनं करणे योग्य नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. बावनकुळे यांचा विचार आहे की, देशभर एक समान संपर्क भाषा असावी. विशेषतः हिंदी. जवळपास ६० टक्के राज्यांमधील कारभार हिंदीतून चालतो.

Nagpur Police : तळपत्या उन्हामुळं वाहतूक सिग्नल बंद

समजून घ्या धोरण

राज्यांच्या भाषेचा सन्मान राखत, प्रत्येकाला हिंदी शिकायला हवी. मला यामध्ये काहीही गैर वाटत नाही, असं ते म्हणाले. यावेळी बावनकुळे यांनी राज ठाकरेंना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. ते म्हणाले, राज साहेबांना माझी विनंती आहे की, या मुद्द्याला समजून घ्या, कारण राज साहेब खूप समजदार आहेत. जेव्हा शालेय पाठ्यक्रमात हिंदी शिकवण्याचा विषय येतो, तेव्हा त्यात काय वाईट आहे? ह्या गोष्टीला राजकारणाचे रूप देणे योग्य नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास आहे की, राज ठाकरेंना या विषयावर समजून विचार करायला हवं. केंद्र सरकारने जे राष्ट्रीय धोरण आणलं आहे, त्याचं उद्दीष्ट समजून घेतल्यावर, हिंदी शिकवणीचा विषय त्या धोरणाचा भाग असावा हे राज साहेबांना समजेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. बावनकुळे यांनी राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त करत, मी त्यांना भेटून विनंती करेन की, आपल्याला राष्ट्रीय धोरणाचे योग्य प्रकारे पालन करावं लागेल, असं देखील सांगितलं.

Shalarth ID scam : नागपूरनंतर अमरावती विभागातही चौकशीची सुरुवात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!