प्रशासन

Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश

Nagpur : अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून संगणक व पुस्तकांचे वाटप

Author

नागपूरमध्ये आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने कर्तव्यपूर्ती उपक्रम अंतर्गत शाळांना संगणक आणि ग्रंथालयांना आधुनिक पुस्तके वाटप करण्यात आली.

शिक्षणाच्या गुणवत्तेचा पाया मजबूत करण्यासाठी आमदार निधीचा वापर शिक्षणवृद्धीसाठी करणे हे एक सामाजिक कर्तव्य आहे. हे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. कर्तव्यपूर्ती या विशेष उपक्रमातून त्यांनी आपल्या पदवीधर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांतील शाळांना संगणक आणि ग्रंथालयांना आधुनिक पुस्तकांचे वाटप केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सोमवारी 21 एप्रिल रोजी नागपूर नियोजन भवनात आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.

निवडून आल्यानंतर माझ्या शिक्षणाशी जोडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या स्वरूपाचा विचार केला. मी ठरवले की आमदार निधीचा प्रत्येक रुपया शिक्षणासाठीच खर्च करायचा. हे फक्त आश्वासन न राहता, गेल्या पाच वर्षांपासून मी सातत्याने प्रत्यक्षात उतरवत असल्याचे अभिजित वंजारी यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव तायवाडे, प्राचार्या शरयू तायवाडे, ग्रंथालय अधीक्षक मिनाक्षी कांबळे, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे यांच्यासह अनेकांची उपस्थित होती. आजही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेला नाही.

Uday Samant : ठाकरेंचं एकत्र येणं म्हणजे उपरोधाचं राजकारण

तंत्रज्ञानाची गरज ओळखली

विद्यार्थ्यांसमोर असलेली ही तफावत कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे वंजारी यांनी सांगितले. संगणकीय शिक्षण आजच्या काळात अनिवार्य बनले आहे. पण ग्रामीण भागात या सोयी फारशा पोहोचल्या नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी दरवर्षी शाळांना संगणक वाटप करण्याचा संकल्प केला आहे. ग्रंथालयांमध्ये अद्ययावत आणि युगानुरूप साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केलेला आहे. विविध विषयांवरील पुस्तके जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, करिअर संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक इत्यादींचे वितरणही केले जात आहे.

गावातील लायब्ररीत अजूनही दशकांपूर्वीचीच जुनी पुस्तके आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार निधीचा योग्य आणि उद्देशपूर्ण वापर कसा करता येतो, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. कार्यक्रमात आमदार वंजारी यांच्या हस्ते शाळांमधील प्रतिनिधींना संगणकांचे आणि जिल्ह्यातील ग्रंथालयांना नव्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव तायवाडे म्हणाले, आमदार सजग असला तर निधीचा समाजहितासाठी वापर होऊ शकतो.

ग्रंथालयांनी आणि शाळांनी याचा खरा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, हीच अपेक्षा. त्यांनी पुढे सूचवले की, सध्या जिल्हा ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके देण्यात येत आहेत. पण भविष्यात शाळांतील लायब्ररींसाठीही अशीच पुस्तके उपलब्ध करून देण्याचा विचार आमदारांनी करावा.

Nagpur : शिक्षक घोटाळ्यात पाच अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!