देश

Congress : देशभरात सोनिया – राहुल प्रकरणाचा वणवा

Nationwide Mass Movement : राजकीय लढे, आरोपांची स्पर्धा, काँग्रेसचा संविधान बचाव मोर्चा

Author

काँग्रेसने ईडीच्या कारवाईविरोधात देशव्यापी संविधान बचाव आंदोलनाची घोषणा केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसचे प्रमुख नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यानंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात निर्णायक जनआंदोलनाची घोषणा केली आहे. ही कारवाई “राजकीय सूडबुद्धीची पराकाष्ठा” असल्याचा आरोप करत काँग्रेसने देशभरात “संविधान वाचवा” या नारेखाली आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पक्षाने स्पष्ट केले आहे की हे आंदोलन केवळ पत्रकार परिषदांपुरते मर्यादित नाही. 25 एप्रिल ते 30 मे दरम्यान देशभरात 49 ठिकाणी संविधान बचाव रॅली, जिल्हास्तरीय कार्यक्रम, मतदारसंघ पातळीवरील बैठका आणि घरोघरी जाऊन जनसंपर्क मोहिम राबवल्या जाणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात अधिकृत प्रेस नोट जारी करून सविस्तर माहिती दिली. या पार्श्वभूमीवर, नागपूरमध्ये नुकतेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शांततामय आंदोलन झाले होते, ज्याने संविधानाच्या रक्षणाची मागणी पुढे आणली होती. काँग्रेसने याच मुद्द्यावर व्यापक देशव्यापी जनजागृती करण्याचे ठरवले आहे.

Parinay Fuke : जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी आमदाराचे क्रांतिकारी पाऊल

जिल्ह्यास्तरीय कार्यक्रम

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून काँग्रेसने ही मोहीम त्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून काँग्रेस ही रॅलीज आणि घरोघरी जनसंपर्काच्या माध्यमातून आपला जनाधार मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसने ही मोहीम फेब्रुवारी 2024 मध्ये अहमदाबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय अधिवेशनात मंजूर झालेल्या ‘न्याय पथ’ ठरावाच्या प्रचारासाठी सुरू केली आहे. यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय पुनर्संचयित करण्याचा निर्धार करण्यात आला होता.

काँग्रेसच्या देशव्यापी संविधान बचाव मोहीमेअंतर्गत विविध टप्प्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 24 एप्रिल दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात देशभरातील प्रत्येक राज्यात पत्रकार परिषदा घेतल्या जातील. त्यानंतर 25 ते 30 एप्रिल या कालावधीत राज्यस्तरीय ‘संविधान वाचवा’ परिषदांचे आयोजन होईल. 3 ते 10 मे दरम्यान जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडतील, तर 11 ते 17 मे या काळात विधानसभा मतदारसंघ पातळीवर बैठका घेण्यात येणार आहेत. शेवटच्या टप्प्यात, 20 ते 30 मे दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन ‘संविधान वाचवा’ जनसंपर्क मोहीम राबवतील. या प्रत्येक टप्प्याचा उद्देश म्हणजे जनतेपर्यंत थेट पोहोचून संविधानाच्या रक्षणासाठी जनजागृती निर्माण करणे आणि भाजप सरकारच्या धोरणांविरोधात व्यापक जनमत उभे करणे.

Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश

मोहीमेचा थेट परिणाम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने ठामपणे सांगितले आहे की, या आंदोलनातून जनतेशी थेट संपर्क वाढवून त्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा आणि भाजपविरोधात मजबूत जनमत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम केवळ राजकीय प्रतिउत्तर न राहता, लोकशाही टिकवण्यासाठीचा संघर्ष असल्याची काँग्रेसची भूमिका आहे. आगामी काळात या आंदोलनाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!