प्रशासन

Amaravati : बेकायदेशीर ताब्यांवर मनपाचा बुलडोझर चालूच

Encroachment Drive : अमरावतीत अतिक्रमणांचा अखेरचा श्वास

Author

अमरावती शहरात अतिक्रमणांचे संकट गडद झाल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ठोस कारवाईचा निर्धार केला आहे. रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेला झंझावाती सुरुवात झाली आहे.

अमरावती शहरात अतिक्रमणांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांवर, फूटपाथवर, जिथे जागा दिसेल तिथे अतिक्रमणांचे जंगल उभे झाले आहे. काहींनी तर तात्पुरत्या झोपड्या नाही, तर पक्के शेड ठोकून बिनधास्त अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येते. या वाढत्या अतिक्रमणांमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अमरावती महानगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू केली आहे. शहरातील अनेक भागांत ही कारवाई झपाट्याने सुरू आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने पाहता पाहता अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहे. काही अतिक्रमण धारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून घेतले आहेत.

Parinay Fuke : कमळाचं कनेक्शन पुन्हा जमलं; काँग्रेसचे दोन धुरंधर वळले

धडक मोहीम

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिणी नगर, सायंस्कोर परिसर, शिवटेकडी, बस स्टँड परिसरात जेसीबी आणि पाच ट्रकच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे तसेच पोलीस कर्मचारी आणि मनपाचे विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत शहरातील रस्ते, फूटपाथ मोकळे होत नाहीत तोपर्यंत ही मोहिम थांबवली जाणार नाही. नागरिकांच्या सुरळीत जीवनासाठी ही कारवाई अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे. अन्यथा महानगरपालिका जबरदस्तीनं ते हटवेल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.

Maharashtra : बावनकुळेंचा देवाभाऊंवर ‘व्होट ऑफ कॉन्फिडन्स’

नागरिकांचा प्रयत्नांना पाठिंबा

महानगरपालिका प्रशासन लवकरच कापड बाजार, गांधी चौक यांसारख्या मुख्य भागातील अतिक्रमणावर धडक कारवाई करणार आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा ठरणारे व नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण दूर करणार आहे. तसेच शहरातील नागरी जीवन अधिक सुलभ करण्याचा मानस मनपाने व्यक्त केला आहे.

सदर मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत महानगरपालिकेचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त होते. फूटपाथवर चालणे अशक्य झाले होते. बाजारपेठेत गर्दी वाढली होती आणि अग्निशमन वाहनांपासून रुग्णवाहिका देखील वेळेवर पोहचू शकत नव्हत्या.

Bhandara Sand Mafiya : माफियाकडून तहसीलदाराला फाइव्ह स्टार सुविधा

शहरातील अतिक्रमण दूर करून रस्ते आणि फूटपाथ मोकळे करणे हा नागरी प्रशासनाचा प्राथमिक उद्देश आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिकेने केली आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमेने अमरावती शहरात एक नवा शिस्तबद्ध बदल घडवून आणण्याची सुरुवात झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!