
संजय गायकवाड यांनी पोलिसांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे यांनी गायकवाडांना पोलिसांच्या सन्मानाबाबत चेतावणी दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील सभेदरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधत आपली नाराजी व्यक्त केली. या घडामोडीमुळे एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत आमदार संजय गायकवाड यांना कठोर शब्दांत समज दिली. पोलिस दलाच्या सन्मानाशी कोणताही प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही, हे शिंदेंनी ठामपणे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना समजावताना म्हटले की, महाराष्ट्र पोलीस दल त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न विसरता येणार नाहीत. पोलीस रात्रंदिवस अहोरात्र सेवा देतात, म्हणून राज्यातील जनता सुरक्षित आहे. संजय गायकवाड यांना थेट बजावणी करताना शिंदेंनी स्पष्ट केले की, काही व्यक्तींच्या वागणुकीवरून संपूर्ण यंत्रणेला दोष देणे अन्यायकारक आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे. वर्दीचा सन्मान राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही शिंदे यांनी बजावले.

Nana Patole : आतंकवाद्यांचा हल्ला पहलगामवर अन् पटोलेंचा हल्ला सरकारवर
नाराजीनंतर ठोस पाऊल
आपल्या विधानावर झालेल्या वादानंतर संजय गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यांनी आपले विधान वैयक्तिक अनुभवावर आधारित असल्याचे सांगून त्यावर ठाम असल्याचेही नमूद केले. गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढली आहे. नेतृत्वाच्या शिस्तीला हादरा देणाऱ्या या प्रकाराने शिंदे यांच्या निर्णय क्षमतेवरही सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडे थेट तक्रार केल्यानंतर शिंदेंनी तातडीने कारवाई करत गायकवाड यांना समज दिली. यावरून स्पष्ट होते की, सत्तेत असतानाही शिस्तीचे आणि मर्यादेचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक मंचावर जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने बोलणे अपेक्षित आहे. गायकवाड यांचे विधान केवळ पोलिसांचा नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या प्रतिमेवरही घाला घालणारे असल्याची भावना अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे.
Sanjay Gaikwad : शिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या तर कारवाई निश्चित
गटात वाढती अस्वस्थता
संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे शिंदे गटातील अंतर्गत गोंधळ वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. नेतृत्वाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे भान गायकवाड यांना देण्याचा प्रयत्न शिंदे यांनी या प्रसंगी केला. शिवसेना शिंदे गटाच्या शिस्तीला धक्का पोहचवणाऱ्या कोणत्याही कृतीला यापुढे कडेकोट प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेशही या कारवाईतून सर्वांना मिळाला आहे.
पोलिस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कोणतेही विधान किंवा कृती शिंदे यांच्यासाठी अजिबात स्वीकारार्ह नाही. राज्यातील प्रत्येक पोलिसाचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांच्या त्यागाला उचित मान मिळालाच पाहिजे, हा संदेश देत एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व अधिक ठामपणे अधोरेखित केले आहे.