महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : समस्या जिथे, निराकरण तिथल्या तिथेच

Amravati : महाराजस्व अभियानाने नागरिकांना मिळणार त्वरित सेवा 

Author

विकासाला गती देत आणि प्रशासन अधिक गतीशील व पारदर्शक बनवत, राज्य सरकारने ‘महाराजस्व अभियान’ राबवण्याची घोषणा केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेची प्रभावी सुरुवात करण्यात आली.

राज्याच्या प्रगतीला नवे आयाम देण्यासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील सांस्कृतिक भवन येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मोठी घोषणा केली. महसूल मंडळ स्तरावर ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागरिकांच्या विविध अर्जांवर त्याच ठिकाणी तातडीने निर्णय घेण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांच्या कामांमध्ये गती, प्रामाणिकपणा आणि न्याय या तीन गोष्टींची हमी दिली जाणार आहे. राज्य शासनाने जलद व पारदर्शक प्रशासन देण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. या विशेष कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे तसेच माजी खासदार नवनीत राणा यांनी मानाचे स्थान लाभले होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांचीही उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

विस्तारीकरण अंतिम टप्प्यात

फक्त महसूल व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता, अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विविध प्रकल्पांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तारीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पायलट प्रशिक्षण केंद्राची उभारणी पूर्ण होणार आहे. याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमरावतीचा झेंडा फडकवण्यासाठी आयटी पार्कची उभारणी जलद गतीने सुरू आहे.

Vijay Wadettiwar : पहलगाम हल्ल्यावरील माझ्या विधानाचा खेळखंडोबा केलाय 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रधानमंत्री मित्रा टेक्सटाईल पार्कचा प्रकल्प अमरावतीला मिळाल्यामुळे उद्योगक्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून एक व्यापक जलपुरवठा योजना आकार घेत आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अखेरीस बचतगटांना स्वनिधी योजनेंतर्गत अर्थसहाय्य, तसेच ट्रॅक्टर, कृषी अवजारे, तीनचाकी सायकली आणि विहिरींसाठी कार्यादेशांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार विजय लोखंडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले.

राज्य शासनाच्या या नव्या मोहिमेमुळे, महसूल क्षेत्रातील दिरंगाईला आळा बसणार आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अमरावतीच्या विकासासाठी आखलेली ही व्यूहयोजना येत्या काळात संपूर्ण विदर्भासाठीही विकासाचा आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!