
मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर देशभर चर्चा सुरू आहे. या निर्णयावर विरोधकांनी मौन बाळगल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
केंद्र सरकारने नुकताच घेतलेला जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे देशभरात स्वागत होत असताना विरोधी पक्ष मात्र गप्प बसल्याचं चित्र आहे. या मौनावरूनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भुमिका घेत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवे वळण आणणारा स्फोट केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचं जोरदार समर्थन करताना विरोधकांवर तिखट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आजवर जातीच्या नावाने घसा कोरडा करणारे विरोधी नेते आता या निर्णयाचं कौतुक करण्यास तयार नाहीत. हा त्यांच्या संकुचित राजकीय मानसिकतेचा नमुना आहे.

खरा चेहरा उजेडात
राजकारणात कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी बोलणं आणि प्रत्यक्षात काही न करणं, हा विरोधकांचा शिरस्ता असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी म्हटलं की, जातीच्या नावाने असंतोषाचे राजकारण करणारे नेते, जे स्वतःला बहुजनांचे कैवारी म्हणवून घेतात. त्यांची सत्यता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उघड झाली आहे.
नेत्यांनी केवळ आपल्या पक्षांच्या हितासाठी जातीचे प्रश्न उचलले. पण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. जेव्हा केंद्रातील मोदी सरकारने या मुद्द्यावर निर्णय घेतला. तेव्हा या नेत्यांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण अभिनंदनाचे सौजन्यही दाखवले नाही.
Devendra Fadnavis : आरोग्याला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सज्ज
समाजाला नवसंजीवनी
जातीनिहाय जनगणनेमुळे देशातील सर्वच घटक समाजाच्या अडचणी आणि मागण्या स्पष्टपणे समोर येणार आहेत. त्या आधारे विकासाचा आराखडा आखता येणार आहे. ही जनगणना केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता, ती सामाजिक न्याय आणि समावेशासाठी प्रभावी ठरणार आहे.
बावनकुळे यांनी याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे खोटे तोंड उघड करत, त्यांच्या डोळ्यावरचा विकासविरोधी झापडा दूर केला आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश समतोल विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. या मार्गात जातीनिहाय जनगणना हे एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
जनतेच्या मनात विश्वास
सत्तेसाठी समाजात दरी निर्माण करणाऱ्या विरोधकांचा हेतू या प्रसंगावरून जनतेसमोर आला आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यातून हेही स्पष्ट झालं की विरोधकांचा लढा समाजासाठी नव्हे, तर निवडणुकांसाठी आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी या मुद्द्यावर मौन बाळगणं हेच पुरेसं सांगतं की त्यांचा समाजप्रेमाचा दावा किती खोखला आहे. मोदी सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद देण्याऐवजी या नेत्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठीच विचार केला.