प्रशासन

Prashant Padole : रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर उद्घाटनाआधीच भेगांची मालिका 

Gondia : घोषणांचा गाजावाजा पण रस्त्यावर धोक्याचा अंदाजा

Author

रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या भेगा पडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याची पाहणी करून निकृष्ट कामावर चौकशीची मागणी केली आहे.

रामटेक-तुमसर-गोंदिया या राज्यमार्गाला काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला होता. मोठा गाजावाजा करून या मार्गाची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या महामार्गाचे काम अपूर्ण असून गंभीर त्रुटी स्पष्ट होत आहेत. उद्घाटनापूर्वीच या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. वाहनचालकांसाठी ही परिस्थिती प्रचंड धोकादायक बनली आहे. तुमसर तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशा मार्गावर भेगा पडल्याने दुचाकी चालकांचे जीव टांगणीला लागले आहेत.

रस्त्यावर पडलेल्या खोल भेगांमध्ये दुचाकीचा टायर अडकण्याची शक्यता असल्याने जीवघेणे अपघात घडू शकतात. या समस्येबाबत काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याची पाहणी करून उघडपणे निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून हा महामार्ग उभारण्यात आला आहे. पण तो उद्घाटनाच्या आधीच धोकादायक ठरत आहे. याचा अर्थ बांधकामात गंभीर त्रुटी आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे फक्त एका ठिकाणचं उदाहरण नाही.

Buldhana : मेहकर नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक   

चौकशीची गरज भासली

यापूर्वीही तुमसर-माडगी मार्गावरून प्रवास करणारे अनेक नागरिक रोज धुळीने भरलेल्या, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करत होते. बांधकाम सुरू असतानाच वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. बांधकामाच्या वेळेस रस्त्यावर मुरुम टाकलेला होता. परंतु नियमानुसार त्यावर पाणी शिंपडले जात नाही. परिणामी परिसरात धुलीकणांचे प्रमाण प्रचंड वाढले असून समोरून येणारी वाहने दिसेनाशी होतात. ही स्थिती केवळ अपघातांना निमंत्रण देणारी नाही, तर नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करणारी आहे.

स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसाला अनेक छोटे-मोठे अपघात घडत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या महामार्गाचं काम केंद्रीय रस्ते विभागाच्या अखत्यारित येत असून विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. मात्र नागरिकांचा प्रश्न असा आहे की, एवढ्या गंभीर समस्यांवर तक्रार करायची कुणाकडे? यंत्रणेचा रस्त्याच्या दर्जावर कुठलाही प्रभाव दिसून येत नाही.  राष्ट्रीय महामार्ग हा केवळ विकासाचा प्रतीक नसून जनतेच्या सुरक्षिततेचा आधार असतो. काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी डॉ. पडोळे यांनी केली आहे.

Nagpur : मेट्रो स्टेशनला आग, नागरिकांची धडपड

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!