
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाचं माणसे प्रमुख राज ठाकरे यांनीं विरोध दर्शविला आहे.
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर 7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार प्रतिउत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर या नावाने राबविण्यात आलेल्या हवाई मोहिमेत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तर कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबीयांसह तब्बल 90 अतिरेक्यांचा खात्मा झाला. ही कारवाई युद्धपातळीवर झाली नसली तरी तिचा परिणाम थेट पाकिस्तानच्या गाभ्याला भिडणारा होता. संपूर्ण देशभरातून या मोहिमेचे कौतुक होत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील निर्णयांवर थेट आणि परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरेंनी यावेळीही आपली शैली कायम ठेवली आहे. राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, दहशतवाद्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. पण त्यासाठी युद्ध किंवा फक्त एअर स्ट्राईक हा उपाय नाही. अमेरिकेने ट्विन टॉवरवरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना एक-एक करून शोधून ठार केलं. भारतानेही तसंच करायला हवं. त्यांनी पुढे उपस्थित केला की, पहलगामसारख्या पर्यटनस्थळी हजारो पर्यटक येतात. तिथे सुरक्षेचं काय झालं?

ड्रग्स समस्येवर प्रश्नचिन्ह
हल्ल्यानंतरही अतिरेकी सापडलेले नाहीत. हीच गोष्ट सर्वात चिंताजनक आहे. सरकारनं लोकांचं लक्ष युद्ध किंवा एअर स्ट्राईककडे वळवण्याऐवजी थेट जमिनीवर उतरून कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे, असं ठाकरेंचं म्हणणं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाम हल्ल्याच्या वेळी सौदी अरेबियात होते. तिथून परत येऊन थेट बिहारच्या प्रचारसभेत गेले. मग लगेच अदानींच्या केरळ बंदर उद्घाटनाला गेले. देशातील अशा गंभीर परिस्थितीत प्रचारसभा आणि उद्घाटनं टाळता आली असती, असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. सुरक्षा ही प्राथमिकता असली पाहिजे, इव्हेंट मॅनेजमेंट नव्हे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
पहालगांचा मुद्दा संपूर्ण देशात फिरत असतांना राज ठाकरेंनी देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवरही सरकारला खडसावलं. नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतंय. लहान पोरं, शालेय विद्यार्थी ड्रग्ज घेतायत. हे ड्रग्ज कुठून येतंय, कोण आणतंय यावर सरकार काय कारवाई करतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऑपरेशन सिंदूर”सारखी गूढ नावं देऊन सरकार लोकांचं लक्ष वेधते, पण जमीन स्तरावर कोणती ठोस पावलं उचलली जातायत? हे कोणालाच समजत नाही. सिंदूर हे सन्मानाचं प्रतीक आहे. पण जर हे ऑपरेशन केवळ नावे आणि दिखावा असेल तर त्या सिंदूराला काही अर्थ राहत नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.