महाराष्ट्र

India Pakistan War : पाकिस्तानने तोडला सीजफायर 

Ceasefire : पाकड्यांनी दाखवला खरा रंग

Author

सीजफायरची घोषणा होताच पाकिस्तानने विश्वासघात करत पुन्हा एकदा आगळिक केली. सीमेवर गोळीबार करून त्यांनी शांततेच्या कराराची पायमल्ली केली, भारतीय सेनानेही कठोर प्रत्युत्तर दिलं.

भारत आणि पाकिस्तान यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण आणि तात्काळ सीजफायर लागू करण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये 12 मे रोजी औपचारिक चर्चा होणार होती. परंतु सीजफायर झाल्यानंतरही पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या विश्वासघाती वृत्तीचे दर्शन घडवत आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गोळीबार सुरु केला.

जम्मूतील अरनिया, आर.एस. पुरा आणि सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार शेलिंग करण्यात आले. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे सीमेलगतच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, काही ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झाल्याचंही समजतंय. पाकिस्तानच्या या उकसवणाऱ्या कारवाईला सीमा सुरक्षा दलाने (BSF) तितक्याच तीव्रतेने उत्तर दिलं. भारतीय जवानांनी पाकिस्तानी फायरिंगला ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर देत सीमेवर पुन्हा भारतीय सामर्थ्याचं दर्शन घडवलं.

Prashant Padole : सर्जिकल स्ट्राईकसाठी शस्त्र नाही, स्टेथोस्कोप घेऊन सज्ज

सीजफायरनंतरही पाकिस्तान शांत बसलेला नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या दगाबाज स्वभावाची आणि विश्वासघाती नीतीची प्रचिती दिली आहे. भारताच्या बळकट संरक्षण यंत्रणेमुळे त्यांच्या कटकारस्थानांना यश मिळालं नाही. पाकिस्तानने सीजफायर तोडून जे कृत्य केलं, ते स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय तत्त्वांच्या विरोधात असून, भारत यावर कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. सीमावर्ती नागरिकांमध्ये चिंता वाढली असली तरी भारतीय जवानांची तत्परता आणि शौर्य यामुळे सीमांची सुरक्षितता अबाधित आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!