महाराष्ट्र

Prakash Ambedkar : लग्न अजून झाले नाही, पण संसार सुरू

Political Drama : राष्ट्रवादीच्या मनोमिलनावर प्रकाश आंबेडकरांचा कडवट प्रतिसाद

Author

महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाची चर्चा होऊ लागली होती. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यावर मिश्किल टिपणी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये ठाकरे बंधूंनी युती करणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या गोष्टीने राज्यातील राजकारणाला थरारक वळण देत होत्या. या चर्चांमुळेच महाराष्ट्राच्या राजकीय बाजारात वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचा भास होऊ लागला होता. या सर्व गोंधळांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनीही राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवली होती. मात्र, या चर्चांना विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि आता त्या प्रतिसादांना थोडा ब्रेकही लागल्याचे जाणवू लागले आहे.

अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य मनोमिलनावर थेट निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या मनोमिलनाला ‘लग्न अजून झाले नाही, पण नवरा-नवरी एकत्र संसार करायला लागलेत’ अशा शेलक्या शब्दांत टोकाचा समाचार दिला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनी एक मुलाखतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येऊ शकतात, असा इशारा दिला होता. तसेच, या निर्णयासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे अंतिम अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा

निवडणुकीतून गैरहजेरी

शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळाला होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी या मनोमिलनाला कठोर टीका केली आहे. सध्या साखर कारखान्यांची निवडणूक सुरू आहे. त्यात शरद पवारांच्या गटाने आपली उपस्थिती दाखवलेली नाही. अजित पवार निवडणूक पूर्णपणे हाताळत आहेत, हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळेही प्रकाश आंबेडकरांनी अजून लग्न झाले नाही, पण नवरा-नवरी एकत्र संसार करायला लागलेत अशी उपरोधात्मक टीका केली आहे. त्यांच्या मते, या गटांमधील मनोमिलन अजून फार दूर आहे. त्यांच्यातील फरक कमी होण्याऐवजी अधिकच स्पष्ट होत आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे लवकरात लवकर मनोमिलन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणाले की, शरद पवारांनी याबाबत आशेचा किरण दाखवला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. त्यांनी आपली मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले, मात्र अजित पवार हे पवार परिवारातच असल्यामुळे मनोमिलनासाठी विशेष मध्यस्थीची गरज नसल्याचेही ते म्हणाले. राजकीय वादातून बाजूला सरकत, प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवरही टीकेचा डोंगर कोसळवला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यांवर जाऊन अनेक देशांना भेट दिली, पण युद्धात एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तानविरोधात खासदारांच्या पाठवलेल्या शिष्टमंडळाचे काम निरर्थक आहे. चर्चा होतील, पण त्या शक्ती आणि संसाधनांचा अपव्यय आहे, असा कटाक्ष त्यांनी केला. या विधानातून आंबेडकरांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Buldhana : शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कृषी विभागाचे भरारी पथके मैदानात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!