प्रशासन

Yavatmal : महावितरणच्या नियमभंगासाठी अभियंत्याला निलंबनाचा शॉक

Mahavitaran : आपत्ती व्यवस्थापनात अपयशाची पुन्हा एक कथा

Share:

Author

महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित राहतो आहे. मात्र, महावितरणकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने अखेर यवतमाळमधील एका अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनच्या आगमनाआधीच वादळ वारं आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, महावितरण मात्र लोकांच्या संकटात भर घालणारे ठरत आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित झाला असून, महावितरणकडून अद्यापही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात तर महावितरणचा बेजबाबदारपणा इतका टोकाला गेला की, त्याचे फटके एका अधिकाऱ्याला थेट निलंबनाच्या कारवाईच्या रूपात बसले.

दारव्हा ग्रामीण वितरण केंद्र -2 सहाय्यक अभियंता राहुल डोंगरे यांना त्यांच्या हलगर्जीपणामुळे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीतही डोंगरे यांनी मुख्यालयात थांबणे टाळले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट वर्धा गाठले आणि दुसऱ्या दिवशीच कार्यालयात परतले.दारव्हा विभागात संध्याकाळच्या सुमारास वादळासह जोरदार पावसाने धडक दिली. या पावसामुळे 12 उपकेंद्रांचे वीजपुरवठा तात्पुरता खंडित झाला. परिणामी, सुमारे 40 हजार वीजग्राहकांची रात्र पूर्णतः अंधारात गेली.

Nagpur : शालार्थ घोटाळ्यात अधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता संस्थाचालकांची गाठ

दरवर्षीची तीच कहाणी

अशा वेळी, वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर काम करण्याची गरज होती. मात्र, सहाय्यक अभियंता राहुल डोंगरे मात्र या जबाबदारीपासून दूर राहिले. महावितरणच्या परिपत्रकानुसार, कोणत्याही अधिकाऱ्याला आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडण्यास मनाई आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु डोंगरे यांनी ना वरिष्ठांच्या पत्राला उत्तर दिले, ना वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले. याशिवाय, कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यातही ते अपयशी ठरले. या सर्व गोष्टींचा विचार करूनच अधीक्षक अभियंत्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

पावसाळ्यातील हे वीज संकट काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील नागरिक अंधारात ढकलले जातात. कारण, शहरांमध्ये वास्तव्यास असलेले वीज अधिकारी रात्रीच्या वेळी गावांमध्ये पोहोचत नाहीत. यामुळे गावकरी रात्रभर ताटकळत राहतात. महावितरणच्या या उदासीनतेमुळे लोकांच्या संयमाचा अंत होतोय. या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणने हाय अलर्ट जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित दुरुस्ती करावी, यासाठीही स्पष्ट आदेश आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे आदेश किती अमलात आणले जातात, याचे उदाहरण यवतमाळातील या घटनेतून स्पष्ट दिसते.

Devendra Fadnavis : दादा, शिंदेंचा संवाद कमकुवत

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!