महाराष्ट्र

Maharashtra : लाल सलामीसाठी माओवाद्यांची बंदची तयारी

Naxalites : बसवराजूच्या मृत्यूवरून भडका

Author

महाराष्ट्रात पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे माओवाद्यांची संख्या घटत आहे. बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवादी संतप्त झालेले आहे.

महाराष्ट्रातील दंडकारण्याच्या जंगलांमध्ये जेथून माओवाद्यांची चळवळ उगम पावली होती, तिथेच आता शांततेच्या वाऱ्याची झुळूक जाणवत आहे. राज्यभरात पोलिस दलाने घेतलेल्या आक्रमक आणि बुद्धिमान पावलांमुळे अनेक माओवादी हतबल होत आत्मसमर्पण करत आहेत. ज्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख माओवादाच्या गड म्हणून होती. तिथेच आज ही चळवळ संपल्यासारखी वाटते. पोलिसांच्या प्रयत्नांना मिळालेलं यश हळूहळू महाराष्ट्रातील लालवादाला पूर्णविराम देताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छुपे असलेले माओवादी आता पुढे येऊन आत्मसमर्पण करत आहेत.

दुसरीकडे, काहींना चकमकीमध्ये ठार करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. यातूनच स्पष्ट होते की महाराष्ट्रातील नक्षलवाद हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत अलीकडेच झालेल्या चकमकीत माओवादी चळवळीचा कडवा नेता गंगन्ना उर्फ बसवराजू ठार झाला. बसवराजू अर्थात नंबाला केशव राव हा माओवाद्यांचा जनरल सेक्रेटरी होता. त्याच्या मृत्यूनंतर माओवादी गटात संतापाची लाट उसळली आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलं आहे की, 21 मे रोजी 27 माओवादी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली.

Nagpur : सत्ता हातात असूनही रस्त्यावर उतरले भाजप आमदार

संघर्षाची शहरी शक्यता

प्रवक्ता अभयच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले की, जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 540 माओवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या त्यांच्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केलं आहे.या निषेधार्थ माओवाद्यांनी येत्या 10 जून रोजी देशभर बंद पुकारला आहे. यासोबतच 11 जून ते 3 ऑगस्ट दरम्यान बसवराजू व अन्य माओवाद्यांच्या स्मरणार्थ स्मारक सभा आयोजित करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. एकीकडे आत्मसमर्पणाची वाट निवडणारे माओवादी, तर दुसरीकडे हिंसेचा मार्ग चोखाळणारे कट्टर गट माओवादी आंदोलन एका विचित्र वळणावर उभे आहे.

माओवादी प्रवक्ते विकल्प यांनी म्हटलं की, जंगलांमध्ये मागे हटत चाललेल्या लढ्यामुळे आता माओवादी संघर्ष शहरी भागांमध्ये सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात आंदोलनाचा विस्तार करण्यात येतो आहे. मात्र, याला उत्तर देताना महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी माओवाद्यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आत्मसमर्पण आणि पुनर्वसन हे माओवाद्यांसाठी संघर्ष संपवण्याचा मार्ग आहे. बसवराजूचा मृत्यू ही त्यांच्या चळवळीला मोठी हादर देणारी घटना होती. त्यामुळेच माओवादी आता केंद्र सरकारवर खोटे आरोप करत आहेत.

Washim : भावना गवळींचा वाढदिवस गुमनाम गेला

पाकिस्तानच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र माओवादी चळवळीच्या प्रस्तावांना नकार का दिला जातो, हा माओवाद्यांचा प्रश्नही संदीप पाटील यांनी सडेतोड फेटाळून लावला.जंगलांमधून हळूहळू माओवाद्यांची माघार सुरू झाली असून, पोलिसांची यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. महाराष्ट्रातील माओवाद्यांच्या ताकदीवर झालेला आघात एवढा जबरदस्त आहे की, गडचिरोलीसारख्या कडव्या भागातसुद्धा आता माओवाद हा शब्दही विरून जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!