महाराष्ट्र

Akola : दलित वस्ती निधीवर सावरकर-देशमुख यांच्यात घमासान

Political Drama : अकोल्यात विकासाच्या ऐवजी रंगली राजकीय दंगल

Share:

Author

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात दलित वस्ती निधीच्या वाटपावरून जोरदार वाद झाला.

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एका अपेक्षित शांततेच्या वातावरणात अचानकच राजकीय वादामुळे वातावरण गरम झाले आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून जोरदार तंटा उफाळून आला. अकोला येथे विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आयोजित ही बैठक हळूहळू राजकीय वादाच्या रंगात रंगली आणि वाद इतका टोकाचा झाला की, दोघांमध्ये प्रचंड अश्लील शिवीगाळ झाली. हाणामारी टाळण्यासाठी अधिकारी आणि पालकमंत्र्यांना वेळेत हस्तक्षेप करावा लागला.

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडले. या बैठकीत निधी वाटप आणि विकासकामांच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. पण दोन्ही आमदारांमध्ये दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून चांगला भांडण सुरू झाले. या भांडणामुळे अधिकारी आणि इतर आमदारांना हस्तक्षेप करून दोघांना वेगळे करावे लागले, अन्यथा हा शाब्दिक वाद हाणामारीच्या रूपात उफाळू शकला असता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील बैठकीनंतर रागात आक्रमक वागणूक झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकमेकांवर शिवीगाळ व दगाबाजीचा प्रकार घडला, ज्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Bhandara : गोसेखुर्दच्या थेंबा थेंबातून उमलणार विदर्भाची आशा

संयमाची अपेक्षा

भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, मी आणि नितीन देशमुख यांच्यात काही वाद झाला. पण आम्ही एकमेकांना शिवीगाळ केली नाही. फक्त मोठ्या आवाजात बोललो. तर नितीन देशमुख यांनीही आपला तात्विक मतभेद असल्याचे सांगत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही अश्लील शब्द किंवा हाणामारी घडलेली नाही. पालकमंत्री आकाश फुंडकर यांनीही या बैठकीत केवळ विकासाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. पण स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे राजकीय वाद वाढले असून त्यामुळे लोकांमध्ये नाराजीही वाढत आहे.

राजकारणात मतभेद असले तरी संयमाने चर्चा करणे अपेक्षित असते, पण अकोल्यात या तत्वाला हरताळ फासली गेली, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याच्या नागरिकांकडून ऐकायला मिळते. बैठकीदरम्यान काही लोकांनी शूटिंग करत असल्याने पालकमंत्र्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी नितीन देशमुख यांच्या समर्थकांना बैठकीबाहेर थांबण्याची सूचना केली. यावर नितीन देशमुख यांनी आक्षेप नोंदवला, त्यानंतर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी देखील आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये वाद वाढला. या सगळ्यामुळे बैठकीचे मूळ उद्दिष्ट जिल्ह्याच्या विकासाची चर्चा बाजूला पडून वाद रंगले. अकोला जिल्ह्यातील या घडामोडीमुळे विकासाच्या जागी राजकारणाचे रंग अधोरेखित होताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांची अपेक्षा आहे की, राजकीय नेते त्यांच्या मतभेदांना बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येतील. पुढील बैठक शांततेत आणि विकासाच्या मुद्यांवर केंद्रित होतील, अशी अपेक्षा आहे.

Harshwardhan Sapkal : समृद्धीच्या नावाखाली, खोक्यांचा महामार्ग 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!