महाराष्ट्र

Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार

Nagpur : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरात आशेचे किरण

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

नागपुरात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांतून झरत असलेल्या ‘स्वप्नातील घर’ या आशेच्या धारा आता वास्तवात रूपांतरित होत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यात 480 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

नागपूर शहराच्या हृदयात पार पडलेल्या या सोहळ्याने, विकासाची नवीन दिशा दाखवली असून महाराष्ट्र बेघरमुक्तीच्या दिशेने दृढ पावले टाकत आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने नागपूर शहरासाठी अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात आले. अग्निशमन सुरक्षेसाठी ‘पांचपावली अग्निशमन केंद्र’ उभारले गेले आहे. ओमकार नगरात अत्याधुनिक ‘स्मार्ट टॉयलेट’ सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ‘हॉट मिक्स प्लांट’साठी नवीन यंत्रसामग्रीचा वापर आणि ‘कळमना जलतरण तलाव’ प्रकल्पाचे उद्घाटन या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी ठरल्या.

Devendra Fadanvis : राहुल गांधींना मेक इन इंडिया समजतच नाही

सुरक्षिततेचा नवा पाया

सार्वजनिक आरोग्यासाठी ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ ही 27 ठिकाणी कार्यरत केंद्र उभारण्यात आली आहेत. झाडांचे संवर्धन करण्यासाठी ‘ट्री ट्रान्सप्लांटर मशिन’, अग्निशमनासाठी अत्याधुनिक फायर टेंडर्स, तसेच शासनाच्या निधीतून बस वाहतुकीचा विकासही यामध्ये समाविष्ट आहे. विशेषतः अंबाझरी घाटाकडे जाणाऱ्या नवीन पुलाच्या लोकार्पनाने शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार आहे.या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांना प्रत्यक्षात चाव्या देण्यात आल्या. श्रावण कामत, मंजुश्री टेंबुर्णे, राहुल बावसकर, अतुल वानखेडे, मुस्ताक सौदागर आणि नीता उईके यांसारख्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचे भाव झळकत होते. हे केवळ घर नव्हते, तर सुरक्षिततेचं आणि स्थैर्याचं प्रतीक होतं. जिथे आता त्यांच्या स्वप्नांना उभं राहायला एक हक्काचं छप्पर मिळालं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, इथे उभारण्यात आलेले बांधकाम हे अत्यंत दर्जेदार आणि सर्व मूलभूत सुविधांनी परिपूर्ण आहे. प्रत्यक्षात जेव्हा आम्ही या प्रकल्पात प्रवेश केला, तेव्हा त्याच्या भव्यतेने आम्ही भारावून गेलो. 2014 वर्षी आठवते की, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांनी ‘सर्वांसाठी घरे’ हे ध्येय आपल्या सरकारपुढे ठेवलं. या योजनेच्या अंमलबजावणीत जे अडथळे होते, ते त्यांनी दूर केले. अनेक आव्हानांवर मात करत, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ही योजना यशस्वीपणे राबवली.आतापर्यंत महाराष्ट्राने घर बांधणीबाबतीत इतर सर्व राज्यांचे विक्रम मोडीत काढले आहेत. हे सर्व शक्य झालं, ते देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे असेही बावनकुळे म्हणाले.

Prakash Ambedkar : काँग्रेसने वेळेत ऐकलं असतं, तर चित्र वेगळे असते

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!