महाराष्ट्र

शिवसेनेच्या मुखपत्रातून Devendra Fadnavis यांचं कौतुक

लेखातून Gadchiroli जिल्ह्याच्या विकासासाठी आनंद

Share:

Author

गडचिरोली सारख्या माओवाद प्रभावित जिल्ह्याचा देवेंद्र फडणवीस यांनी विकास केला आहे. यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येते. मात्र यंदा शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानिमित्तानं त्यांचं कौतुक करण्यात आले आहे. माओवादग्रस्त जिल्हा ही गडचिरोलीची ओळख पुसली जात आहे. आता गडचिरोली पोलाद सिटी होणार आहे. याचा आनंद असल्याचं सामनामधून नमूद करण्यात आलं आहे.

गडचिरोलीला नवीन ओळख मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. सामनामधून असंच नमूद करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांची भरपूर स्तुती केली होती. महाराष्ट्रातील गडचिरोली हा शेवटच्या टोकाचा जिल्हा आहे. तीन राज्यांच्या सीमा गडचिरोलीला लागून आहेत. आतापर्यंत गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर माओवादी कारवाया सुरू होत्या. मात्र अलीकडेच महायुती सरकारनं गडचिरोलीला भरभरून दिलं आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी फडणवीस यांचं कौतुक केलं.

शब्दाची Commitment महत्वाची मानणारा सामाजिक डॉक्टर

Development गरजेची

देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. गडचिरोलीतील विकासातून कोणत्याही खाण सम्राटाचा फायदा होऊ नये, अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे. सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

विकास जनतेसाठी असतो. खाणसम्राटांसाठी नव्हे. खरा विकास दाखवून देण्याची काळजी ‘देवाभाऊ’ यांनी घ्यावी, अशी अपेक्षाही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. त्यांना दिलेले वचन पूर्ण करावे. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम आहे. गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असं सामनातून लिहिण्यात आलं आहे. सामनामधील या लेखाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद आणि आभार व्यक्त केले आहे. सामानामधून अनेक दिवसांपासून चांगल्या लिखाणाची प्रतीक्षा होती, असं ते म्हणाले.

सामनामधून यापूर्वीच चांगले लिखाण शक्य होतं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास करण्याचे व्रत घेतलं आहे. सामनातून फडणवीस यांचं कौतुक होणं ही चांगली बाब आहे. यापूर्वीही फडवीस यांनी अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. भविष्यातही घेतील. त्यासंदर्भातही सामनातून लिखाण होईल, असं बावनकुळे म्हणाले. उशिरा का होईना, सामनाला हे कळलं असंही ते म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!