महाराष्ट्र

Ajit Pawar अन् Devendra Fadnavis यांच्यात हिंमत नाही 

Sanjay Raut म्हणाले, दबावामुळे उपमुख्यमंत्री Amit Shah यांच्या भेटीला

Author

बीड जिल्ह्यातील सरपंचाचे हत्याप्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे नीकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी संबंधित असलेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव टाकत आहेत. अजित पवार यांच्यावर दबाव वाढल्याने त्यांनी 8 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रात सध्या सगळ्याच माफियांना अभय आहे. राज्यातील माफियांना राजकीय आशीर्वाद मिळत आहे. सत्तेत असलेल्यांपैकी अनेक मंत्री खंडणीखोर आणि माफियांशी जुळलेले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. परंतु अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

बीड प्रकरणावरून सुरेश धस भेटले Ajit Pawar यांना

तातडीनं Action गरजेची

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. हे फार मोठे षडयंत्र आणि कारस्थान आहे. त्यामध्ये खरे काय आहे, हे सांगण्यापेक्षा स्वतःची जातीय व्होट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तो निषेधार्ह आहे. मुंडे यांच्या समर्थकांनी किंवा लोकांनी ज्यांचे खून केले हे त्यांच्याच समाजातील होते. बीड भागातील 90 टक्के खून हे त्यांच्याच समाजातील लोकांचे झाले आहेत. अपराध्याला जात आणि धर्म नसतो. यामध्ये जात आणि धर्म आणू नका. अपराधी हा अपराधीच असतो, असे राऊत म्हणाले.

सरकारने दिलेली मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी नाकारली. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाली की, आधी खून करायचा आणि मग कुणाची किंमत ठरवायची हा कुठला प्रकार? त्यांचा खून हा पोलिस कस्टडीत झाला. हा कोठाडीतला खून आहे. ज्यांनी खून केले त्यांचे समर्थन तुम्ही विधानसभेत केले. त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून 10 लाख रुपये देत आहेत. याचा धिक्कार व्हायला पाहिजे, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!