
पेन ड्राइव्ह बॉम्ब प्रकरणात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून राज्य सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. या आरोपांवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेन ड्राइव्ह बॉम्ब प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. एसआयटी चौकशीची मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक काम करणार आहे. या पथकात पोलिस उपमहानिरीक्षक राजीव जैन, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलिस आयुक्त आदीकराव पोळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

मंत्रालय सुरक्षेचा फज्जा: Minister Narhari Zirwal यांच्या दादागिरीमुळे वादंग
मोठे षड्यंत्र
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. खोट्या गुन्ह्यांचे जाळे विणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याचा पुरावा पुढं आला होता. विधिमंडळाच्या सभागृहात पुरावा सादर करण्यात आला. एका ऑडिओ क्लिपमध्ये एसीपी सरदार पाटील आणि एका अज्ञात व्यक्तीमध्ये या कटाची चर्चा होत होती. दोघांचा आवाज यात ऐकायला मिळत होता. यात परमबीर सिंह आणि संजय पुनामिया यांच्या मदतीने फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राजकारण तापलं
राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. त्यामुळं महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजप नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सत्य बाहेर येईल, असा दावा भाजपनं केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र ही चौकशी राजकीय सूडभावना असल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने याबबात परिपत्रक काढलं आहे. त्यात चौकशी तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांनी फेरतपासणी केली. पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रारीही या तपासात चौकशी होणार आहे.
पेन ड्राइव्ह बॉम्ब प्रकरण आणि त्यावरील एसआयटी चौकशी होणार आहे. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजप या चौकशीचा वापर महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी करेल. आता असा आरोप विरोधकांकडून होत आहे. भाजप नेते मात्र या प्रकरणात संपूर्ण सत्य बाहेर येईल, याचा विश्वास व्यक्त करत आहेत. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या तपासातून काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.