
राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अशात आता एका विशेष धर्माला लक्ष करून नितेश राणे यांनी मोठ विधान केल आहे.
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्य सरकारला निशाणा साधून विरोधक टीका करत आहेत. त्यापलीकडे जाऊन आता भाजप नेते नितेश राणे यांनी मोठं वक्तव्य केल आहे. “महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी सरकार आले आहे. हिंदूंचे रक्षण करणारे सरकार आहे. त्यामुळे आता धर्मांतर खपविल्या जाणार नाही. हिरवा रंग धारण करणाऱ्या सापांनी वळवळ सुरू आहे. राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात येणार आहे, असे नीतेश राणे म्हणाले. चंद्रपुरातील गांधी चौक येथे हिंदू धर्म सभेत ते बोलत होते.
नीतेश राणे म्हणाले की, लव जिहादमधून हिंदू मुलींची फसवणूक केली जात आहे. त्यांची वळवळ अजूनही कमी झालेली नाही. जर त्यांची वळवळ थांबली नाही तर प्रत्येकाला आतमध्ये टाकू. आम्ही सगळे हिंदू विचारधारेचे लोक आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कडवट हिंदू मुख्यमंत्री म्हणून सरकारचे नेतृत्व करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारमध्ये आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.

आम्हाला सगळी Information
गो हत्या बंद करा, अन्यथा प्रत्येक वॉर्डात वराह जयंती साजरी करावी लागणार. त्यासाठी आता आम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कारण आता सरकारच आमचे आहे, हिंदूचे हे सरकार आहे. सत्तेमध्ये असल्यामुळे सर्व यंत्रणा आमच्या हातात आहे. कोण कुणाची दाडी कुरवाळत आहे आणि कोण कुणाची अवेळी बिर्याणी खात आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही त्याचा वेळीच कार्यक्रम करू, असा इशारा नीतेश राणे यांनी दिला आहे.
नीतेश राणे पुढे म्हणाले, हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला त्याची जागा दाखवून देऊ. पाकिस्तानात बसलेला तुमचा अब्बा देखील काहीही करू शकणार नाही. जिहादी हिंदू समाजातील मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना स्थान नाही. हिंदुत्ववादी बाप सरकारमध्ये बसले आहेत. राज्यात उगाच वळवळ करायची नाही. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असे नितेश राणे म्हणाले. धर्मांतर खापवून घेणार नाही. राज्यात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा लवकरच लागू करणार आहोत. महविकास आघाडी सरकारच्या काळात हे सर्व चालले. परंतु आता असे काही खपवून घेणार नसल्याचे नितेश राणे म्हणाले.
.. तर शाहरुख, सलमानचाही बंदोबस्त करू
सलमान खान व शाहरुख खान आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर माझ्याकडे या. त्यांची नावे द्या त्यांचा तिथेच बंदोबस्त व कार्यक्रम करण्यात येईल, असे राणे म्हणाले. महाराष्ट्रात सत्ता उभारण्यासाठी हिंदू पाठीशी ऊभा राहिला. त्यामुळे हिंदू समाजासाठी काम करणार आहोत. रोहिंग्यांना लवकरात लवकर राज्याच्या बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तेव्हा तुम्ही बॅग भरा आणि पाकिस्तानात चालते व्हा, असेही राणे म्हणाले. तिरंगा झेंडा मंत्रालयात फडकतो आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतो आहे, हे लक्षात असू द्या. मी राज्याचा मंत्री म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे, असेही नितेश राणे म्हणाले.