महाराष्ट्र

देवाभाऊ, गडकरींच्या गावातील Traffic Police करताहेत काय?

उपराजधानीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना

Author

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात विकासकामे सुरू असतानाही वाहतूक कोंडी कायम आहे. पोलिसांची निष्काळजी आणि अपयशी वाहतूक व्यवस्थापनामुळे नागरिक संतापले आहेत.

ज्या शहराचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी आहेत, तेथेच वाहतूक कोंडीचा तिढा सुटता सुटेना हे चित्र दिसत आहे. नागपूर शहरातील मनीष नगर अंडरपासच्या उद्घाटनानंतरही नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झालेली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर अनेक विकासकामे सुरु झाली आहेत, मात्र वाहतूक व्यवस्थेच्या समस्यांवर तोडगा लावण्यात प्रशासन अद्यापही अपयशी ठरले आहे.

जत्रेचा गोंधळ

शहरातील सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू आहे. पार्डी, गांधीबाग, नंदनवन यांसारख्या भागांमध्ये पुलांचे आणि रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषतः या भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त अपुरा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. एका बाजूला विकासकामे होत असली तरी वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे न केल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

नोव्हेंबर महिन्यात डबल हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली. हा निर्णय अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महत्त्वाचा ठरला असला तरी दुसऱ्या बाजूला रस्त्यांवरील वाहतूक कोंडी लोकांच्या दैनंदिन जीवनाला त्रासदायक ठरत आहे. चारही बाजूने सुरू असलेल्या रस्त्यांमुळे नागरीकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ज्यामुळे इंधन आणि वेळ दोन्हीचा अपव्यय होत आहे.

कारवाईमुळे Sand Mafia धुमाकुळाला आळा

पोलिस आहेत कुठे?

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असली तरी त्यांचे नियोजन अपुरे ठरत आहे. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात वाहतुकीच्या समस्या सातत्याने दिसून येत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या मते, रस्त्यावरील गोंधळ सोडवण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.

सध्या नागपूर शहराचे सौंदर्यीकरण आणि रस्ते कामे वेगाने होत असली तरी त्या सोबतच वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलिसांनी रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली पाहिजेत. तसेच, सिग्नल यंत्रणा अद्ययावत करून मार्गदर्शन केंद्रांची संख्या वाढविणेही महत्त्वाचे ठरेल.

संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा Ramdas Kadam यांनी घेतला समाचार

कोंडीनं संयम सुटतोय

शहरातील वाहतूक कोंडी आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागपुरकरांच्या संयमाचा अंत होत आहे. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य दाखवले असले तरी प्रशासनाने त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे. नागपूर शहरातील ही वाहतूक कोंडी सुटण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि दळणवळण विभागाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

शहराच्या विकासासाठी थोडा त्रास सहन केला पाहिजे, असे म्हणत नागपुरकरांनी काही प्रमाणात सहकार्य केले आहे. मात्र, वाहतुकीचे नियोजन सुधारल्याशिवाय नागपूर शहराचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही, हेही स्पष्ट आहे. आता या समस्येवर तोडगा लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावी लागणार आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!