महाराष्ट्र

‘रूको जरा सब्र करो’ Nana Patole यांची इनिंग बाकी आहे

आता Bhandara मधील गल्लीत नव्हे Delhi मध्ये फिरणार

Share:

Author

‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करीत नाना पटोले यांचं ‘दिल’ तोडणाऱ्या काँग्रेसनं दुसऱ्याच दिवशी ‘वुई कॅन थिंक अगेन’ असा संदेश नानांना दिला आहे.

नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील ‘जीगर का टुकडा’ बनलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी काँग्रेसनं ऐन ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला ब्रेकअप केलं. बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली. विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस विधिमंडळाचं पक्षनेते पद देण्यात आलं. त्यामुळं नाना आता केवळ साधे आमदारच राहणार काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. नानांचं काय होणार, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांचा पडला होता. मात्र लगेचेच ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी काँग्रेसनं पुन्हा तुटलेलं ‘रिलेशनशिप’ पूर्ववत करण्याचे संकेत नानांना दिले आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कार्यालयातून नानांचा फोन आला होता. या फोननंतर नानां ‘खोया प्यार’ परत मिळाल्यासारखं वाटलं. नाना पटोले यांना नुसतं आमदार ठेऊन भंडाऱ्या गल्लीत फिरू देणार नाही. आता त्यांना काँग्रेस दिल्लीत फिरायला लावणार आहे. लवकरच नानांना अखिल भारतीय स्तरावरील मोठं पद मिळणार आहे. राहुल गांधी यांनी नानांना महाराष्ट्रातून मुक्त केलं आहे. मात्र त्याबदल्यात त्यांना ते नवी ‘महा’जबाबदारी दिल्लीतून देणार आहे. त्यामुळं नानांची इनिंग संपली याचा आनंद मानणाऱ्यांना त्यांनी ‘रूको जरा, सब्र करा’ असाच संदेश दिला आहे.

नाना पटोले ठरले लकी; Bhandara मध्ये महायुती पडली फिकी 

अद्याप बॅकफूटवरच

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळेच नाना पटोले यांच्या मागे हात धुवून लागले. बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर नानांची विकेट केव्हा पडते याची सगळेच प्रतीक्षा करीत होते. निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत नानांकडं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कायम होती. त्यानंतर त्यांनीच स्वत: प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. त्यामुळं या दु:खाच्या प्रसंगात काँग्रेसमधील सगळेच नेते शांत झाले. मात्र परिस्थिती पूर्ववत झाली. नाना पटोले पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यानंतर ऑपरेशन नाना हटाव पुन्हा सुरू झालं. पण नानांची राजीनामा देऊन ठेवला होता. तो मंजूर करून काँग्रेसनं फेरबदल केले.

नानांची राजीनामा मंजूर करीत हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. वडेट्टीवार यांनाही राज्याच्या राजकारणात ठेवण्यात आलं. माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, बंटी ऊर्फ सतेज पाटील. वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर ही चर्चेतील नावं मागे पडली. राहुल गांधी यांनी आपल्या टीममधील सपकाळ यांना पसंती दर्शविली. वडेट्टीवारांच्या नावालाही ग्रीन सिग्नल दिला. अशात नानांचं काय? असा सवाल पडला. अमिताभ बच्चन याचं ‘केबीसी’ संपतातच ते ‘ओह समय समाप्ती की घोषणा’ असं म्हणतात. असं तर नानांच्या बाबतीत झालं होणार नाही ना? असं त्यांच्या चाहत्यांना वाटू लागले. पण नानांनी आपली ‘लाइफ लाइन’ आधीच ‘सेफ’ करून ठेवली होती. आता ते दिल्लीत ‘महा’जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाले आहे. अधिकृत घोषणा तेवढी शिल्लक आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!