महाराष्ट्र

फडणवीस सरकारचा Big Move शब्द दिला तो पाळलाच

राज्यात होणार दीड लाखांची मेगा भरती

Author

महाराष्ट्रात रोजगाराच्या संधींना नवा वेग देत फडणवीस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने दिलेला 75 हजार भरतीचा शब्द पाळला आहे. त्याहून अधिक म्हणजे तब्बल दीड लाख पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्तीपत्र वाटप सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात नव्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी आपले ध्येय जनसेवेवर केंद्रित ठेवावे आणि ग्रामीण भागात जलसंधारणाच्या माध्यमातून मोठा बदल घडवावा.

कृषिमंत्र्यांनीच केली देशाच्या पोशिंद्याची भिकाऱ्याशी तुलना

देवाभाऊ यांची ग्वाही

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रोजगार निर्मितीला वेग देण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी 75 हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले गेले होते. मात्र राज्य सरकारने त्याहून अधिक म्हणजे दीड लाख पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू असून, अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील जलसंधारण उपाययोजनांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकला. या मोहिमेमुळे राज्यातील अनेक गावे जलयुक्त झाली आहे. भूजल पातळी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध झाले असून, शेती उत्पादनातही वाढ झाली आहे.

कलम 370 हटवणाऱ्या मोटा भाईंनी महाराष्ट्राला खडसावले

मोठी संधी उपलब्ध

महिला आणि बालविकास विभागाने देखील मोठी भरती जाहीर केली आहे. या विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात अंगणवाडी सेविकांच्या 5 हजार 639 भरती होणार आहे. सोबतच मदतनीसांच्या 13 हजार 243 अशा एकूण 18 हजार 882 पदांची भरती केली जाणार आहे.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सांगितले. 15 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्यसेविका पदांसाठी 374 जागांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यातील 102 पदे सरळसेवेने तर उर्वरित 272 पदे निवडीद्वारे भरण्यात येणार आहेत.

नागपूरच्या पारडी पुलाची साडेसाती संपली

फडणवीसांचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार रोजगारनिर्मितीसाठी ठोस पावले उचलत आहे. सरकारी भरतीसोबतच महिला आणि बालविकास, जलसंधारण आणि अन्य विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

विशेषतः जलसंधारण आणि जलयुक्त शिवार यांसारख्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना दीर्घकालीन फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांची भरती झाल्यास महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल.
फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहेत. राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!