महाराष्ट्र

Sanjay Raut: चार वेळा आमदार झाली पण, ताटात घाण करून गेली

Neelam Gorhe: मर्सिडीज गाड्या दिल्या की पद मिळतं

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांच्या ‘मर्सिडीज मिळाली की पद मिळतं’ या विधानावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी रोज घडत असतात. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकाला जात आहे. एकमेकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका थांबायचं नाव घेत नाही. ‘सत्ता हवी की सन्मान?’ या प्रश्नावरून शिवसेना दोन तुकड्यांत विभागली गेली. मात्र आता हा वाद नुसता राजकीय नाही, तर व्यक्तीगत पातळीवरही पोहोचला आहे. नुकताच या वादात आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे, आणि हा ट्विस्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला गंभीर आरोप.

सध्या या वादात राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या अडकल्या आहेत. संजय राऊत यांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप हा काही नवीन प्रकार नाही, पण संजय राऊत यांच्या या जहाल वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

MSEDCL: वीज दरवाढीच्या आगीत विदर्भातील उद्योगसंपर्क होरपळणार

राजकारण तापलं

शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी एक स्फोटक विधान करत संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की पद मिळतं. असा दावा करत त्यांनी पक्षातील नेत्यांवर आणि व्यवस्थेवर थेट आरोप केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी यांवर चांगली जप्रकर टीका केली आहे. ठाकरे गटाचे आक्रमक खासदार संजय राऊत यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना नीलम गोऱ्हे यांच्यावर जबरदस्त टीका केली. ही बाई विश्वासघातकी आहे. उद्धव ठाकरेंनी तिला चार वेळा विधान परिषदेवर पाठवलं, पण शेवटी ताटात घाण करून गेली, असे जहाल शब्दांत राऊत यांनी गोऱ्हेंवर निशाणा साधला. इतकंच नव्हे, तर नीलम गोऱ्हे या सभागृहात लक्षवेधी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात, असा आणखी एक गंभीर आरोपही केला.

Sanjay Rathod: वनमंत्रीपासून कॅबिनेट मंत्र्यापर्यंत राजकारणात पुनरागमनाची नवी चाल

राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना लक्ष्य करत त्यांना नीच, नमकहराम अशा विशेषणांनी हिणवलं. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? त्यांना असले लोक कधीच पसंत नव्हते. बाळासाहेबांनी तुम्हाला आमदार बनवलं नाही, तुम्हाला उद्धव ठाकरेंनी संधी दिली, असा हल्लाबोल करत त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

शिंदे गट आणि ठाकरे गटामधील राजकीय वैर किती तीव्र झालं आहे, हे स्पष्ट होत आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना राऊत यांनी एकच इशारा दिला तुमच्यावर असले आरोप करण्याइतकी तुमची लायकी आहे का? तुमच्या विकृतीचं प्रदर्शन सर्वांसमोर आलं आहे.

Nagpur: पारडी उड्डाणपुलाचा खेळखंडोबा

विनायक पांडेचा गौप्यस्फोट

नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. मी शिवसेनेचा सात वर्षे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपमहापौर आणि महापौर होतो, पण उद्धव ठाकरेंनी कधीही पदासाठी माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही. पण नीलम गोऱ्हे यांनी मात्र विधानसभेच्या उमेदवारीसाठी माझ्याकडून पैसे घेतले आणि मला उमेदवारी दिली नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, राज्यात अनेक कार्यकर्ते आहेत, जे सांगू शकतात की नीलम गोऱ्हेंनी त्यांची कशी लूट केली आहे. त्यांनी पक्षाचीच नाही, तर संपूर्ण शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फसवणूक केली आहे.

Vijay Vadettiwar: संतांच्या वादग्रस्त वक्त्यव्यावर नागपुरात रस्त्यावर उतरले अनुयायी

वैयक्तिक सुडभावना

आरोप-प्रत्यारोप हे राजकीय कुरघोडीचा भाग आहेत की त्यामागे काहीतरी गंभीर सत्य दडलेलं आहे, हा मोठा प्रश्न आहे. राजकीय पक्षांत अंतर्गत लढाया सुरू असतात. मात्र ज्या पद्धतीने संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यात आरोपांची वाकयुद्ध रंगली आहे, त्यामुळे दोन्ही गटांमधील कटुता स्पष्ट दिसून येते.

एकीकडे उद्धव ठाकरे गट नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर आक्रमक भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे शिंदे गट हे आरोप अधिकाधिक गंभीर असल्याचा दावा करत आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणी खरं आणि कोणी खोटं, हे वेळच ठरवेल. पण एक मात्र नक्की शिवसेना नावाच्या वटवृक्षाला लागलेली फूट अजूनही भरून निघालेली नाही आणि या संघर्षात राजकीय प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सत्ता यांची मोठी किंमत मोजली जात आहे.

Maharashtra: नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प दहा मार्चला

अजून किती दिवस

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे नाटक रोज रंगते आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करेल, हे सांगता येत नाही. पण एक मात्र स्पष्ट आहे आता संघर्ष केवळ सत्ता टिकवण्याचा राहिलेला नाही, तर व्यक्तिगत हमरीतुमरीवर उतरलेला आहे. राजकीय नेते कधी विचारतात, जनता आमच्यासोबत आहे का? पण खरी बाब अशी आहे की, हे सगळं बघून जनतेलाच आता विचारावंसं वाटतं हे नाटक अजून किती दिवस.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!