महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठी उद्धव-राज एकत्र

Thackeray Brothers: फडणवीस आणि शिंदे गटाचा खेळ बिघडणार

Author

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळिकीमुळे नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राचं राजकारण हे लोकांना आता फारसं नवं राहिलेलं नाही. राजकारण म्हणजे एक अनिश्चिततेचा पट. इथं मैत्री तात्पुरती असते, गद्दारी क्षणात ठरते, आणि ज्या नेत्यांची विचारसरणी ठाम वाटते, तेच पुढच्या क्षणी नवी युती करताना दिसतात. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेला सत्तासंघर्ष अजूनही संपलेला नाही. एका क्षणी शिवसेनेत फूट पडते, तर दुसऱ्याच क्षणी राष्ट्रवादीत उठाव होतो. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सगळेच नेते वेळप्रसंगी भूमिका बदलतात आणि राजकीय नाट्य अजून रंगत जातं. या गोंधळलेल्या राजकीय रणांगणात आता ठाकरे बंधू पुन्हा जवळ येताना दिसत आहेत, आणि हा नवीन समीकरणांचा पहिला धडा असू शकतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील तणाव. मात्र, आता हेच ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत, आणि हा योगायोग आहे की राजकीय गणित, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एका सामान्य अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात हे दोघे सहज गप्पा मारताना, हसताना दिसले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. कधी काळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोघे अचानक इतक्या सहजतेने भेटू लागले? ही निव्वळ कौटुंबिक जवळीक आहे की आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या तोंडी आहे.

Devendra Fadanvis: गोसीखुर्दचे पाणी थेट बुलडाण्यात

राजकीय संघर्ष

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव आणि राज यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं होतं. भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊनही राज ठाकरेंना विधानसभेत एकही आमदार निवडून आणता आला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभवही मोठ्या प्रमाणात झाला. विशेष म्हणजे, मनसेचे अमित ठाकरेही निवडणुकीत अपयशी ठरले. अशा परिस्थितीत, राज आणि उद्धव एकत्र येऊन ‘ब्रँड ठाकरे’ वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, हा प्रश पडतो.

ठाकरे बंधूंच्या या भेटीवर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मनसेने हा राजकीय हेतू नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण, हे खरंच फक्त कौटुंबिक भेटी आहेत का? की या भेटींतून काही मोठं राजकीय वादळ येणार आहे?

Devendra Fadnavis : आले शेतकऱ्यांचे अच्छे दिन

मातोश्री, कृष्णकुंज एकत्र

ठाकरे कुटुंबात गेल्या काही वर्षांत मोठी दरी निर्माण झाली होती. एकमेकांवर कडवट टीका करणे, व्यासपीठावरून उपहासात्मक टोलेबाजी, हे सगळं प्रेक्षकांनी पाहिलं. मात्र, आता ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटी लोकांमध्ये नवीन उत्सुकता निर्माण करत आहेत.

रश्मी ठाकरे यांच्या भावाच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात, 15 डिसेंबर 2024 रोजी, उद्धव आणि राज ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नातही दोघे दिसले. आणि आता 23 फेब्रुवारी 2025 रोजी एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नातही हे दोन भाऊ एकत्र आले. याला निव्वळ योगायोग म्हणायचं की रणनीती.

Mahayuti: यंदाच्या होळीला लाडकींसाठी गुलालासोबत साड्यांची उधळण

शिवसेना फोडली

एकेकाळी शिवसेना संपवणारे अशी टीका करणारे राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंच्या बाजूला दिसू लागल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंची ताकद घटतेय, दुसरीकडे मनसेचा जनाधारही कमी झालाय. दोघांनी वेगळ्या मार्गाने प्रयत्न केले, पण आता वाटतंय की मराठी अस्मिता टिकवण्यासाठी दोघांना एकत्र यावं लागेल.

शिवसेना भवनाबाहेर काही समर्थकांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून फलकही लावले होते. मात्र त्यावेळी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. पण आता अचानक दोघेही एका पाठोपाठ एका लग्न समारंभात गप्पा मारताना दिसतात? यातून काहीतरी राजकीय खेळी आखली जात आहे का, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis: उर्दू शाळांतील गैरव्यवहारांची चौकशी

फडणवीसांना नवी डोकेदुखी

राज आणि उद्धव एकत्र आले, तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. भाजपने राज ठाकरेंना लोकसभेसाठी सोबत घेतलं, पण विधानसभेत त्यांना काहीही मिळालं नाही. आता राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंच्या जवळ जात असतील, तर भाजपला नवा मार्ग शोधावा लागेल.

जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं ठरलं नाही, तोपर्यंत कुठलाही समझोता नाही, असं आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. त्यामुळे हा ठाकरे बंधूंचा नवा युतीचा प्रयोग आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Congress : धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी भव्य ‘सद्भावना पदयात्रा’

ब्रँड ठाकरे

महापालिका निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यासाठी मोठी लढत होणार आहे. उद्धव ठाकरेंचं पक्षातील वर्चस्व ढासळलं, आणि मनसे अजूनही ताकदीने उभी राहू शकली नाही. अशा परिस्थितीत ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठी या दोघांना एकत्र यावं लागत आहे का.

गेल्या काही महिन्यांत उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहून काही विशेष फायदा झाला नाही. दुसरीकडे, राज ठाकरेंची मनसेही एकट्याने काही करू शकत नाही. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का? की ही फक्त एक भावनिक भेट आहे, याचा खुलासा येत्या काही महिन्यांत होईलच. पण, पुढचं पाऊल काय? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!