
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशींच्या मराठीविरोधी वक्तव्याने महाराष्ट्राच्या अस्मितेवर नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या अपमानाचा तीव्र निषेध करत, जोशींना जाहीर माफी मागावीच लागेल, असा कठोर इशारा दिला आहे.
मुंबई आणि मराठी भाषा यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे . मराठीचा अपमान करणाऱ्या या वक्तव्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, जोशींना जाहीर माफी मागावीच लागेल, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा थेट इशारा दिला आहे.
भाजप आणि संघ परिवाराच्या विचारसरणीत मराठीविषयी तिरस्कार ठासून भरला आहे, हे भैय्याजी जोशी यांच्या विधानावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. मुंबईत राहणाऱ्यांना मराठी शिकण्याची गरज नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असे विधान करून जोशींनी मराठीचा अपमान केला आहे. मुंबईत मराठी संपवण्याचा भाजप-आरएसएसचा कट आता उघड झाला आहे.

मुंबई महाराष्ट्राची आहे
मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून, ती मराठी माणसाने आपल्या कष्टाने उभी केली आहे. मात्र, भाजप आणि संघ परिवाराच्या लोकांना हे पचत नाही. सतत मुंबईवर हक्क सांगण्याचे आणि तिथे मराठीला संपवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. घाटकोपरला गुजराती ठरवणे हा फक्त सुरुवात आहे. पुढे संपूर्ण मुंबईचा मराठीपणा नष्ट करण्याचा डाव आहे. अतुल लोंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, RSS, भाजपच्या हस्तकांनी मराठीचा अपमान केल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही. मराठी अस्मितेवर वाद निर्माण करणाऱ्या कोणालाही जनता शांतपणे पाहणार नाही. मुंबई मराठ्यांची होती, आहे आणि राहणार. संघाच्या विचारसरणीने कितीही डाव टाकले, तरी मुंबईत मराठीचा झेंडा अभिमानाने फडकत राहील.
महाराष्ट्रद्रोहाला मूकसंमती
भैय्याजी जोशींच्या विधानावर राज्यभर संताप आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस आक्रमक झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मुद्द्यावर अजूनही गप्प आहेत. सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. जोशींना संरक्षण देणार की कठोर कारवाई करणार? मुंबईतील मोठमोठ्या कार्यालयांना बाहेर हलवणे, मराठी माणसांना नोकऱ्यांपासून दूर ठेवणे, आणि आता मराठी भाषेलाही संपवण्याचा कट, हे सगळे विरोधात चाललेले RSS,भाजपचे षड्यंत्र आहे.
जोशींनी माफी मागावीच
मुंबईत मराठी विरुद्ध भाजप आणि संघ परिवाराचा हा लढा नव्याने उफाळला आहे. मराठीवर घाव घालणाऱ्या जोशींना तातडीने माफी मागावी लागेल, अन्यथा महाराष्ट्र पेटेल, असा थेट इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे. मराठी जनतेने आता डोळे उघडायला हवेत. भाजप-RSS षड्यंत्राला विरोध करण्याची वेळ आली आहे. मुंबईत राहायचं असेल, तर मराठीचा सन्मान करावा लागेल. अन्यथा संघर्ष अटळ आहे.