महाराष्ट्र

Maharashtra : महायुतीतील दोस्तांचे हाल ‘नो रोल ओन्ली ट्रोल’

Maharashtra Bhushan Award Committee : उपमुख्यमंत्र्यांना उपाध्यक्षपदी निवड 

Author

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीत मोठा बदल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदे अध्यक्ष होते, तर फडणवीस उपाध्यक्ष होते.

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपने पुन्हा आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागली आहे. याआधी समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे होते, तर उपाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. मात्र, आता या दोघांच्या भूमिका अदलाबदल करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

अजित पवारांना देखील या घडामोडीमध्ये उपाध्यक्षपदी स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील अनेक महत्त्वाच्या नियुक्त्यांवरून आधीच वादंग उडाले आहे. अशात हा निर्णय आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा समीकरण बदल घडवण्याच्या तयारीत भाजप आहे, असे स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

Nagpur : रेकीचा रईस जामिनासाठी कोर्टात 

पुन्हा धुसफूस

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीत झालेल्या या बदलांमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याआधी भाजपने आपल्या 11 आमदारांना महत्त्वाच्या विधिमंडळ समित्यांमध्ये जागा दिल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने देखील आपल्या संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली होती. मात्र अद्याप अजित पवार प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की, भाजपने सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा नवा डाव आखला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना काहीशा बाजूला सारत भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेकांचे मत आहे.

भाजपचा मास्टरस्ट्रोक 

भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे महायुतीतील अस्वस्थता अधिक वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना निर्णायक भूमिकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे अनेकांचे मत आहे. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे भाजपचा वरचष्मा पुन्हा स्पष्ट झाला आहे.

महायुतीमध्ये आधीच शिंदे आणि फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याच्या चर्चा राजकारणाच्या बाजारात फिरत आहेत. भाजप एकपाठोमाग एक मोठे धक्के देत आहे. मात्र याचा परिणाम महायुतीवर कसा होईल, हे भविष्यात दिसेलच.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!