महाराष्ट्र

Yavatmal : वर्दीची शान खाली, गुन्हेगारांची मान उंचावली

Bajarangdal : कट्टरपंथीयांकडून रक्षणकर्त्यांचाच बळी

Author

वणी शहरात भररस्त्यात पोलिसांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच जमावाने हल्ला चढवला, वर्दी फाडली, आणि कायदा गुन्हेगारांच्या ताब्यात गेला. सरकारच्या निष्क्रियतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बळी जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

वणी शहरात 9 मार्चला घडलेली घटना म्हणजे केवळ एका गुन्हेगारी मानसिकतेचा परिपाक नाही, तर राज्याच्या ढिसाळ प्रशासनाचे धक्कादायक अपयश आहे. कायद्याचा सन्मान रस्त्यावर चिरडला गेला. पण खरा प्रश्न हा आहे की, एवढा मोठा अपमान सहन करूनही पोलिस गप्प का? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना भर रस्त्यात जमावाने मारहाण केली, पोलिसांची वर्दी फाडली, त्यांना जखमी केले, पण तब्बल सहा दिवस उलटले तरी अद्याप कोणीही यावर ठोस कारवाई केली नाही. हे संपूर्ण प्रकरण प्रशासनाच्या गळपटलेल्या व्यवस्था आणि पोलीस दलाच्या ढिलाईचे ताजे उदाहरण आहे.

बजरंग दलाच्या वणी येथील प्रखंड संयोजकांना मोबिनपुरा मस्जिदजवळील दरबार चिस्ती हॉटेलमध्ये गौमांसाची बिर्याणी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी खातरजमा करून पोलिसांना कळवले. पोलिसांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी जाण्याचे ठरवले. मात्र, पोलीस आणि कार्यकर्ते हॉटेलजवळ पोहोचताच कट्टरवादी जमावाने त्यांच्यावर भ्याड हल्ला चढवला. हल्लेखोरांचा नेता उघडपणे म्हणत होता की, हे माझं क्षेत्र आहे, मी कोण आहे, ते तुम्हाला माहिती नाही. या हल्ल्यात पोलिसांनाही सोडले नाही. एका पोलीस शिपायाच्या कानातून रक्त निघाले, दुसऱ्याच्या पार्श्वभागावर लाथ मारली. एवढेच नव्हे, तर एका पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडून ती हवेत फिरवण्यात आली. या भयंकर प्रकारामुळे पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जीव वाचवून पळाले आणि थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Nitin Gadkari : जो करेल जातिवादाची भाषा, त्याला माझी घणाघाती लाथ

बजरंगदलाची संशयास्पद भुमिका

विशेष म्हणजे, हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी आक्रमक भूमिका घेणारा बजरंग दलही या प्रकरणात आश्चर्यकारकरीत्या शांत कसा? ज्या संघटनेने गोरक्षणासाठी अनेकदा आंदोलनं केली, ती संघटना आता अशा हल्ल्याच्या विरोधात आक्रमक का नाही? यात काहीतरी गंभीर राजकीय गणित, व्यवस्थेतील गुप्त सौदेबाजी किंवा दबावकार्य असल्याचा संशय आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पोलिस आणि बजरंग दलाच्या या शांततेमागे कुणाची सुपारी कार्यरत आहे?ज्या पोलीस शिपायांना मारहाण झाली त्यांनाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दमदाटी केली की, रिपोर्ट करू नका. यापेक्षा अधिक लाजीरवाणी बाब असू शकत नाही .एका बाजूला गुन्हेगार खुलेआम हिंसाचार करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनाच त्यांची तक्रार करण्यापासून रोखले जात आहे.

प्रशासन झोपेत

घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पुरावे असताना अजूनही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. घटनेच्या वेळी जम्मू याने ज्यांना फोन केले, त्याच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली जात नाही आहे. हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला गेला नाही व प्रशासन हे मुद्दाम दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. घटना 9 मार्च रोजी घडली आणि 15 मार्च उजाडला तरी कोणीही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. राज्य सरकार आणि गृहमंत्रालय काय करत आहे? पोलीस दलाची अवस्था एवढी कमजोर झाली आहे की, त्यांनाही संरक्षण मिळत नाही आहे. जर वणीसारख्या ठिकाणी पोलीस आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होणार, ही चिंताजनक बाब आहे.

BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात

सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या घटनेची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील आणि प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अशा घटनांना मोकळीक दिली, तर भविष्यात काय होईल, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण केवळ एका संघटनेचे नाही, तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीचे आहे. जर हल्लेखोरांवर त्वरीत कारवाई झाली नाही, तर हे सरकार आणि प्रशासन गुन्हेगारांचे समर्थन करत असल्याचा आरोप करायला जागा उरणार नाही. या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा प्रशासनाच्या ढिलाईचा फटका संपूर्ण समाजाला बसणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!