महाराष्ट्र

Yashomati Thakur : मतचोरीच्या मुद्द्यावर ठोस पुरावे लवकरच आणणार समोर

Congress : निवडणूक आयोगाच्या कृत्याने देशाची लोकशाही संकटात

Post View : 76

Author

काँग्रेसने निवडणूक आयोगावर मते चोरण्याचा गंभीर आरोप करत अणुबॉम्ब फेकण्याची धमकी दिली आहे.

2024 वर्षाची लोकसभा निवडणूक पार पडली आणि काँग्रेसच्या प्रचंड विजयानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्यावर चर्चेचे वादळ आले. सर्वत्र काँग्रेसची सत्ता येणार असा विश्वास होता. मात्र महाविकास आघाडीच्या अपेक्षांच्या उलट महायुती सरकार सत्तेत आली. या पराभवाचे पडसाद त्यानंतर विरोधकांच्या शंकेच्या बिंदूवर गडद झाले आणि निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. विशेषतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आरोप विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर मते चोरण्याचा गंभीर आरोप केला आहे.

आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी इशारा दिला की, जेव्हा हा स्फोट होईल, तेव्हा निवडणूक आयोग आणि त्याचे दोषी अधिकाऱ्यांना वाचवता येणार नाही. त्यांच्या या शब्दांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. विरोधकांकडून वाढलेल्या आरोपांचा ताण अजूनच वाढला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांचे समर्थन करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा जोरदार आवाज ऐकवला. यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर तगडे आरोप केले आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेसकडे 100 टक्के पुरावे आहेत. जे निवडणूक आयोगाच्या मतचोरीच्या घोटाळ्याला उघड करतात. त्यांच्या या आरोपामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिका आणि कार्यशैलीवर तिव्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

Vijay Wadettiwar : पदाचा मान गेला ‘बार’च्या दारात

मतदान यादीतील बदल

यशोमती ठाकूर यांचे आरोप केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे, तर त्या जनतेच्या हक्कांसाठीही आहेत. जे कोणी लोकशाही विरोधात काम करत आहेत, ते लवकरच उचलून टाकले जातील, असा ठाम इशारा त्यांनी दिला. दरम्यान, बिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणावर वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये मतदारांची संख्या 7.24 कोटींवर आली आहे. जो आधी 7.89 कोटींवर होता. या 65 लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे विरोधकांनी तिथेही आरोपांची शरण घेतली आहे.

विरोधकांच्या आरोपांचा सडेतोड उत्तर देताना निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आम्ही सर्व आरोपांना दुर्लक्ष करत आहोत. आमचे कर्मचारी आणि अधिकारी यांना निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्यास सांगितले आहे. आयोगाने यावर आणखी सांगितले की, बेजबाबदार विधानांकडे दुर्लक्ष करा. निवडणूक आयोगाची या आरोपांवर असलेल्या प्रतिक्रिया नेहमीच शांत आणि सुसंस्कृत राहिल्या आहेत. पण आता हे लक्ष वेधून घेत आहे की, राहुल गांधी आणि यशोमती ठाकूर यांसारख्या काँग्रेस नेत्या निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कठोर टीका करीत आहेत.

Akola BJP : अमली पदार्थाचे तस्कर भाजपचे पदाधिकारी

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!