देश

Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप 

Gautam Buddha : हॉंगकॉंग येथे लिलाव, सरकारने करावा हस्तक्षेप 

Author

तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव होणार आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत श्रद्धेय मानले जाणारे तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्न हाँगकाँगमध्ये लिलावासाठी काढण्यात येणार आहेत. ही बाब समोर येताच देशभरात संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या लिलावाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक आणि सखोल पोस्टमधून हे प्रकरण उघडकीस आणले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांबरोबर सापडलेली ही रत्ने फक्त ऐतिहासिक वस्तू नाहीत. तर बौद्ध धर्मीयांसाठी त्या श्रद्धेच्या आणि आस्थेच्या प्रतीके आहेत. या रत्नांना बुद्धांनी स्वतः वापरले होते किंवा त्यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी अर्पण करण्यात आले होते. त्यामुळे ही रत्ने बुद्धांचीच वैयक्तिक मालमत्ता मानली जातात.

ऐतिहासिक अवशेष

गौतम बुद्धांच्या या रत्नांचा इतिहास अत्यंत रोमांचकारी आहे. इसवीसन पूर्व 480 मध्ये तथागत बुद्धांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या अस्थींसोबत ही रत्ने गोळा करण्यात आली. पुढे इसवीसन पूर्व 240-200 दरम्यान, सध्याच्या उत्तर प्रदेशातील पिप्रहवा या ठिकाणी एका स्तूपात त्यांचे दफन करण्यात आले. 1898 मध्ये या स्तूपाचा उत्खनन करताना, ही मौल्यवान रत्ने आणि बुद्धांचे अवशेष पुन्हा उजेडात आले. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत, ही रत्ने बेकायदेशीरपणे परदेशात नेण्यात आली.

Bogus Teacher Scam : ओटीपी नसल्याने शिक्षण खातं हॅक

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, जर येशू ख्रिस्त किंवा इतर कोणत्याही धर्मगुरूंच्या अवशेषांशी संबंधित वस्तूंचा अशाप्रकारे लिलाव झाला असता, तर जगभरात संतापाची लाट उसळली असती. मग बुद्धांच्या रत्नांचा लिलाव का मान्य केला जात आहे? ही केवळ ऐतिहासिक चोरी नाही, तर बौद्धांच्या श्रद्धेवर आघात आहे,” असे आंबेडकर यांनी ठामपणे नमूद केले आहे.

वारशाची परतफेड

प्रकाश आंबेडकर यांनी या लिलावाच्या विरोधात आवाज उठवत केंद्र सरकारला या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून लिलाव थांबवण्याची आणि भारताच्या पवित्र वारशाची परतफेड सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा केवळ धार्मिक भावना दुखावण्याचा नाही, तर आपल्या सांस्कृतिक स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक वारशाचा देखील आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर विविध बौद्ध संघटना आणि पुरातत्त्व प्रेमी वर्गातूनही या लिलावाला विरोध सुरू झाला आहे. केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून हाँगकाँगमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लिलाव रोखावा, अशी मागणी आता सर्वत्र केली जात आहे.

Ajit Pawar : दांडी एका कार्यक्रमाची, सुरुवात अनेक चर्चांची 

तथागत बुद्धांचे अवशेष आणि त्यांच्याशी संबंधित वस्तूंना केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्य आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कुठल्याही वस्तूंचा लिलाव हा निंदनीयच नाही, तर अपमानास्पद देखील आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा केवळ बौद्ध जनतेचा नसून संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचा असल्याचे अधोरेखित केले आहे. या लढ्याला व्यापक जनसमर्थन मिळावे, अशी त्यांनी बौद्ध समाज आणि सर्व संवेदनशील नागरिकांना साद घातली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!