देश

Jual Oram : रेल्वे थांबली, पुन्हा सुरू झाली अन् केंद्रीय मंत्री गायब

Gondwana Express : शोध मोहीम सुरू झाली मग भेटले दुसऱ्याच गाडीत

Author

रेल्वे प्रवासात चुकामूक होणं सामान्य मानलं जातं, पण यावेळी गोंधळ इतका वाढला की केंद्रीय मंत्रीच हरवले. गोंडवाना एक्सप्रेसमधून सुरू झालेला प्रवास एका थरारक शोध मोहिमेत कधी रूपांतरित झाला, कळलंच नाही.

भारतीय रेल्वेचं नाव ऐकलं की आपल्याला वेळेची अचूकता कमी आणि प्रवाशांची चूकामूक अधिक आठवते. पण यावेळी प्रकरण थोडं वेगळं, थोडं गंमतीशीर आणि थोडं धक्कादायक. कारण प्रवासी चुकला नाही, ट्रेनही चुकीच्या प्लॅटफॉर्मवर गेली नाही, पण केंद्रीय मंत्रीच रेल्वेतून गायब झाले. हे कुठलंही काल्पनिक कथानक नाही, तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांच्या रेल्वे प्रवासातलं खरंखुरं प्रकरण आहे

आदिवासी समाजातून आलेले आणि ओडिशातील सुंदरगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री जुएल ओराम 3 एप्रिल शनिवारी दिल्लीहून जबलपूरच्या दिशेने गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करत होते. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर ते शेवटचे ट्रेनमध्ये चढताना दिसले. सगळं काही ठरलेल्या वेळेनुसार सुरू होतं. पण मग घडला एक अनपेक्षित ट्विस्ट.

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, माओवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा

भीती टळली

रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रेन दमोह स्टेशनवर थांबली. त्याचवेळी केंद्रीय मंत्र्यांची साखरेची पातळी कमी झाली आणि ते काहीतरी खाण्यासाठी तातडीनं ट्रेनमधून खाली उतरले. तेवढ्यात, गाडीने भोंगा दिला आणि सुरू झाली. ओराम यांनी ट्रेनमध्ये परत चढायचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यांचा पाय घसरला आणि ते प्लॅटफॉर्मवर फिस्कटले. सुदैवानं ट्रेनखाली जाण्याची भीती टळली आणि त्यांना फार मोठी दुखापत झाली नाही. या घटनेची काहीच माहिती मंत्र्यांच्या सहकाऱ्यांना नव्हती. ट्रेन निघाली, आणि ते गोंडवाना एक्सप्रेसच्या कोचमध्ये त्यांची जागा रिकामी दिसल्यावर गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांना वाटलं, मंत्री ओराम हरवले की काय? तातडीने रेल्वे पोलिसांना कळवण्यात आलं.

तीन तासांची शोधमोहीम सुरू झाली. पण इकडे मंत्री ओराम मात्र ‘जुगाडू मोड’मध्ये होते. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये त्यांनी चढ घेतला आणि थेट जबलपूरच्या दिशेने निघाले. सकाळी 7 वाजता सिहोरा स्टेशनवर, या एक्सप्रेसच्या बी 3 कोचमध्ये त्यांनी सुखरूप (थोड्या जखमांसह) सापडले. त्यांच्या हाताला आणि पायाला किरकोळ जखमा झाल्या होत्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने प्राथमिक उपचार दिले आणि जबलपूरला आणलं. प्रकरण थोडं ‘फिल्मी’ वाटेल, पण हेच खरं, मंत्री ट्रेनमध्ये चढले, उतरताना साखरेची आठवण झाली आणि गाडीच निघून गेली.

Bacchu kadu : सरकार तीन माकडांची, धुरा सांभाळताय राज्याची

जुएल ओराम हे ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील एक अतिशय गरीब आदिवासी कुटुंबात जन्मले. त्यांची राजकीय कारकीर्द 1989 मध्ये सुरू झाली. 1998 मध्ये लोकसभेत विजय मिळवून, त्यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी घेतली. नंतर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही त्यांना हेच खाते देण्यात आलं. 2024 नंतरच्या मोदी सरकार मध्येही त्यांच केंद्रीय मंत्रिमंडळात पुनरागमन झालं.

या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट होते. मंत्री ओराम विनोदी आणि खंबीर दोघंही आहेत. ट्रेन निघून गेली तरी ते घाबरले नाहीत, दुसरी ट्रेन पकडली आणि जबलपूरपर्यंत पोहोचले. त्यांचं हे ‘रेल्वे अॅडव्हेंचर’ सध्या सोशल मीडियावरही चांगलंच चर्चेत आहे. म्हणतात ना, रेल्वे तुमचं वेळेवर येईल याची खात्री नाही, पण तुमच्या हटके अनुभवांची खात्री नक्की आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!