देश

Pravin Datke : पंतप्रधानांसारखा भाऊ मिळणं देशातील प्रत्येक भगिनीचं भाग्य

Operation Sindoor : बहिणींचं सौभाग्य मिटवणाऱ्यांना भारतीय सेनेचा करारा बदला

Author

पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक केले.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. शोक, संताप आणि संयमाच्या या क्षणी भारतीय सेनेने धाडसी पाऊल उचलत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना करारी उत्तर दिलं आहे. 7 मे रोजी रात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) 9 प्रमुख दहशतवादी तळांवर अचूक आणि योजनाबद्ध हवाई हल्ला केला.

कारवाईत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हि कारवाई अत्यंत काटेकोर आणि तंत्रशुद्ध पद्धतीने पार पडली. या निर्णायक उत्तरामुळे देशात आनंद आणि अभिमानाचं वातावरण आहे. या धाडसी ऑपरेशननंतर नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाचं जोरदार कौतुक करत, सर्व सैनिकांना सलाम केला. त्यांनी सांगितलं की, पहलगामच्या हल्ल्यात अनेक घरांतील लेकरं, पती आणि बंधू गमावलेल्या महिलांचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. त्यांचं सौभाग्य ज्यांनी पुसलं त्यांना भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलं आहे.

Operation Sindoor : बुद्धभूमी शौर्य सैन्याचा, मोदींना फोन शरद पवारांचा

मोदींच्या नेतृत्वाची छाप

दटके म्हणाले, ही फक्त बदला घेणारी कारवाई नव्हे, तर भारताच्या सामर्थ्याचा आणि निर्धाराचा प्रत्यय आहे. ऑपरेशन सिंदूर हे त्या बहिणींच्या वेदनांचा सन्मान राखण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांनी विधवा बहिणींचा बदला घेतला. मी पंतप्रधानांचे आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांचे आभार मानतो. प्रवीण दटके यांनी सांगितले की, जेव्हा या कारवाईपूर्वी बैठक व्हायच्या, तेव्हा पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरचा राग आणि वेदना स्पष्ट दिसायची.

पहलगामच्या हल्ल्यानंतर विधवा झालेल्या बहिणींसाठी त्यांच्या मनात आग होती. त्यांच्या सौभाग्याचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवायचा होता आणि आता तो शिकवला गेला. ऑपरेशन सिंदूर या नावामागेही हाच भावनिक संदर्भ आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या बहिणींचं सिंदूर मिटलं, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांचं आत्मभान परत मिळवण्यासाठी भारतीय सैन्य उभं राहिलं. भारतातल्या प्रत्येक भगिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखा भाऊ मिळणं, ही भाग्याची गोष्ट आहे, असंही दटके यांनी नमूद केलं.

Vijay Wadettiwar : सरकारचं पाऊल ठाम असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा नक्की

हवाई कारवाईदरम्यान केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं असून, कोणत्याही सामान्य नागरिकाला इजा पोहोचवलेली नाही, यावरही प्रवीण दटके यांनी भर दिला. त्यांनी म्हटलं, ही केवळ युद्धसदृश कारवाई नव्हती, तर अचूक नियोजन आणि मानवी मूल्यांची जाण ठेवणारी प्रतिशोधाची कारवाई होती. बालाकोट नंतर पाकिस्तानने बोध घ्यायला हवा होता, पण आता ऑपरेशन सिंदूरने त्यांना भारताच्या दृढ निर्धाराची प्रचिती दिली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!