महाराष्ट्र

Mohan Bhagwat : थेंब-थेंब पडणाऱ्या पावसासारखं संघाचं काम

RSS : पर्यावरणाचे धडे आदिवासींकडून शिका, भागवतांचा संदेश

Author

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मांतरण आणि आदिवासी मुद्यावर मोठे विधान करून ठाम संदेश दिला.

जे आपल्या मूळ धर्मात परत यायला इच्छुक आहेत, त्यांना आपल्यात आणलेच पाहिजे. पण समाजात फूट पडू देऊ नका, ऐक्य हाच आपला बळ आहे, असा स्पष्ट आणि ठाम संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. ते संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. याचबरोबर कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी गुरुवारी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रेशीमबाग मैदानावर भरलेल्या या कार्यक्रमात कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया आणि वर्गाचे सर्वाधिकारी समीरकुमार महांती हे मान्यवर उपस्थित होते.

भागवत म्हणाले, धर्मांतरण कशाला हवं? विविधतेत एकता साधणे हेच आपलं खरे सामर्थ्य आहे. समाजात भाषा, पूजा पद्धती यामध्ये विविधता असली तरी आपले मूळ एकच आहे. इंग्रजांनी आपल्यात फूट पाडली होती. आता त्या ऐक्याच्या पायावर विकास साधायला हवा. त्यांनी पुढे सांगितले, आपण हिंदू आहोत हे ज्ञान देखील आदिवासी संस्कृतीतूनच आपल्याला मिळाले आहे. पर्यावरण रक्षणाच्या विचारांचाही पाया आदिवासी जीवनशैलीत आहे. जे मूळ धर्मात परत येऊ इच्छितात, त्यांना सामावून घेण्याची गरज आहे.

Yashomati Thakur : शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सत्ताधाऱ्यांचे जुलूम

दहशतवादावर आत्मनिर्भरता

संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, 1925 मध्ये जेव्हा संघाची स्थापना झाली, तेव्हा वातावरण वेगळे होते. सावरकर म्हणाले होते की, आमचं काम मुसळधार पावसासारखं आहे. मात्र संघाचं काम थेंब-थेंब जमिनीत मुरणारं आहे. त्याचा खरा फायदा समाजाला होतो. त्यांनी स्पष्ट केले की, संघ संपूर्ण हिंदू समाजासाठी कार्यरत आहे. आदिवासींसाठी वेगळ्या प्रकारची मदत मागावी लागत नाही, कारण ते देखील आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत. देशाच्या सुरक्षा परिस्थितीवर भाष्य करताना भागवत म्हणाले, पहलगाममध्ये अलीकडे झालेल्या हल्ल्याने आपल्याला सतर्क केले आहे. समस्या पूर्णपणे संपलेली नाही.

‘थाऊजंड कट्स’च्या धोरणातून दहशतवाद पोसला जातो आहे. ते पुढे म्हणाले, युद्धाची पद्धत बदलली आहे. आपल्याला आत्मरक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे लागेल. तंत्रज्ञान आणि संशोधनाची नवी दिशा स्वीकारावी लागेल. सैन्य, शासन आपलं काम करेलच. पण खरे बळ समाजाच्या ऐक्यातूनच येते. भागवत यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना उपस्थितांना समाजात फूट टाकणाऱ्यांपासून सावध राहा. विविधतेत एकता जोपासा. धर्म, भाषा, संस्कृती यात भांडण न करता सहकार्य करा. आपण एक आहोत, आपल्या पूर्वजांचा वारसा एक आहे, असा सकस आणि सकारात्मक संदेश दिला.

Ajit Pawar : आधी झाला विरोध, मग किंमत ऐकताच दिल्या जमिनी

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!