महाराष्ट्र

Yashomati Thakur : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊ

Bacchu Kadu : बळीराजाच्या हक्कासाठी शरीराला थांबा नाही

Author

अमरावतीच्या मोझरीत माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचाही पाठिंबा मिळाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोझरीच्या मातीवर शेतकरी आपले वेदना आणि असंतोष व्यक्त करत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कष्ट आणि आश्वासनांचा भंग लक्षात घेऊन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. तब्बल पाच दिवस झाले तरी बच्चू कडू यांनी न औषध घेतले, न थकलेल्या शरीराला विश्रांती दिली, तेव्हा या आंदोलनाचे स्वरूप एकट्याचं नसून एक जनआंदोलनात बदलू लागले आहे. आंदोलनाला आता अधिक व्यापक आकार मिळतोय, आणि त्यामुळे राजकीय उत्तरादेखील उमटायला लागले आहे. या आंदोलनाला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी खुल्या मनाने पाठिंबा दिला आहे.

बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याचं कल्याण हे आमचं धर्म आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव या विषयांवर काँग्रेसने ठाम भूमिका घेतली असून राहुल गांधी यांनी केंद्रस्तरीय सरकारवर सातत्याने दबाव निर्माण केला आहे. यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, आमच्या सरकारने केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात 2024 मध्ये 2 हजार 635 तर मागील सहा महिन्यांत 869 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची काळजीपूर्वक नोंद आहे. अवकाळी पाऊस, कर्जाचा ताण, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांनी शेतकऱ्यांना बंधनकारक परिस्थितीत आणले आहे.

Farmers Agitation : बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या

वैद्यकीय मदतीला नकार

विदर्भ आणि मराठवाडा या भागांत शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. महायुती सरकारने सत्तेत येण्याआधी शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली, पण सत्तेत आल्यानंतर ते आश्वासन फक्त शब्दातच मर्यादित राहिले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा दिवस उलटले असून, बच्चू कडू यांच्या या उपक्रमाकडे महायुती सरकारने दुर्लक्ष करू नये, असा दबाव आता वाढतोय. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्यांना गांभीर्याने घ्यावे, तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा.

शेतकऱ्यांच्या वेदना आणि अपेक्षा याकडे राज्यशक्तींनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा असंतोष आणखी वाढेल आणि तो राजकीय व सामाजिक स्थैर्याला हानी पोहचवू शकतो. बच्चू कडू यांचे आंदोलन सहाव्या दिवशी पोहोचले असून, त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. सकाळपासूनच त्यांना उलट्या झाल्या असून, डॉक्टरांच्या अनेक विनंत्या असूनही त्यांनी औषधोपचार घेण्यास ठाम नकार दिला आहे. सलाईन नाही, औषध नाही मागण्या मान्य होईपर्यंत कोणतीही वैद्यकीय मदत घेणार नाही, असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे त्यांच्या किडनीसह शरीराच्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. तरीही बच्चू कडू यांच्या जिद्दीत जराही कमी झालेली दिसत नाही. त्यांच्या या निश्चयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली असली, तरी त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक बळावला आहे.

Akola Corporation : लाईट चेकर्सचा प्रवासही अंधारातच

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!