प्रशासन

Shalartha Scam : एसआयटीच्या प्रमुख पदावरून सुनीता मेश्राम यांची सुट्टी

Nagpur : पोलिस आयुक्तांनी दिला कठोर इशारा

Author

राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता या तपास पथकातही अनियमितता आणि गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका प्रचंड घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. शालार्थ आयडीच्या बनावट वापरातून शिक्षक भरती प्रक्रियेतील बोगसगिरी उघडकीस आली आहे. गेल्या सहा वर्षांत म्हणजे 2019 ते 2025 या कालावधीत 1 हजार 56 बनावट शिक्षक शाळांमध्ये रुजू झाल्याचे समोर आले आहे. शिक्षक भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार केवळ शिक्षण व्यवस्थेचाच नव्हे, तर प्रशासनाच्या पारदर्शकतेचाही मोठा अपमान करणारा ठरत आहे. बनावट कागदपत्रांपासून बनवलेल्या शिक्षकांपर्यंत आणि त्यांच्या मासिक पगारातून घेतल्या जाणाऱ्या कमिशनपर्यंतचा हा सगळा शिक्षणातला काळा धंदा सध्या सायबर पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

घोटाळ्याची सुरुवात राज्यातील एका छोट्याशा तालुक्यातून झाली असली, तरी त्याचं जाळं आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याचं उघड झालं आहे. खासगी शाळांचे व्यवस्थापक, संस्थाचालक, शिक्षणाधिकारी आणि काही भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतातून ही भरती यंत्रणा बनवली गेली. प्रत्येक बनावट शिक्षकाला शासकीय पगार देण्यात येत होता. त्यातून दरमहा कमिशन घेतलं जात होतं. शासकीय यंत्रणेला डोळ्यात झणझणीत धक्का देणारा हा प्रकार अनेक वर्षे सुरू होता. मात्र आता तो सायबर पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते.

Nana Patole : शिंदे साहेब महाराष्ट्राशी गद्दारीची किंमत कधी मोजणार

राहुल मदने नवे प्रमुख

सहाय्यक पोलिस आयुक्त (सदर) सुनीता मेश्राम यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर झालेल्या तक्रारीनंतर त्यांची या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.मेश्राम यांच्या कामावर सुरुवातीपासूनच शंका घेतली जात होती. काही शाळा व संस्था चालकांनी थेट पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तपासात पक्षपातीपणा होत असल्याची तक्रार नोंदवली. पोलिस आयुक्तांनी या तक्रारी गांभीर्याने घेत तपास पथकाला खडे बोल सुनावले आणि चौकशीची दिशा बदलण्याचे आदेश दिले.सध्याच्या घडामोडींनंतर मेश्राम यांच्याकडून जबाबदारी काढून ती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडे देण्यात आली आहे.

मदने यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण प्रकरणाच्या नव्या तपासाला सुरुवात केली आहे. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक तायडे यांच्यावरही पोलिस उपायुक्त स्तरावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांची एक साखळीच उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिक्षक या पदाकडे समाज नेहमीच आदराने पाहतो. मात्र, अशा घोटाळ्यांमुळे संपूर्ण व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडते. शाळांमधून शिक्षण देण्याऐवजी फक्त पगार घेणाऱ्या बनावट शिक्षकांचा हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखाच आहे. शालार्थ आयडीसारख्या डिजिटल यंत्रणेला बगल देत केलेली फसवणूक ही केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आणि नैतिक हानीसुद्धा घडवणारी आहे.

Nagpur : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उमटला निवडणुकीचा गंध

आता ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!