महाराष्ट्र

Sujat Ambedkar : फक्त नारे नव्हेत, विचारांवरच खरी सत्ता

Buldhana : आंबेडकरवादातील कृत्रिम एकतेवर भक्कम टोला

Post View : 95

Author

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकरांनी मोठ्या सभेत आपला ठसा उमटवला. त्यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आणि आंबेडकरवादी राजकारणात चर्चा रंगवली.

बुलढाण्याच्या नांदुरा शहरात झालेल्या एका जाहीर सभेनंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राजकीय वातावरणात नवी खळबळ उडवली. त्यांच्या भाषणाने सभागृहात उत्साहाच्या लाटा उसळल्या. तर आंबेडकरवादी गटांतील कृत्रिम एकतेवर त्यांनी केलेल्या भाष्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा रंगल्या. वंचित आघाडीच्या झेंड्याखाली उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या जयघोषात सुजात आंबेडकर यांनी विचारांच्या निष्ठेचा जाज्वल्य संदेश दिला.

सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्यात राजकीय भूमिका तर होतीच. पण एका नव्या पिढीच्या विचारांचा आत्मविश्वासदेखील होता. राजकारणातील दिखावा आणि एकतेच्या नावाखालील स्वार्थाचे पडदे दूर करत, सुजात यांनी नव्या सामाजिक आंदोलनाची हाक दिली. नांदुरा येथील प्रचंड गर्दीनेही हे स्पष्ट दाखवून दिलं की, भूमीवरचा संघर्षच खरा. विचारांवरची श्रद्धाच दीर्घकाळ टिकणारी आहे.

Ramdas Athawale : राजसोबत आलो, पण राज गेले

वंचितचा ठाम निर्धार

रिपब्लिकन एकतेच्या चर्चांमध्ये झेंडे वेगळे असले तरी विचारांचा पाया एकच असल्याचं म्हटलं जातं. मात्र, याच एकतेच्या नावाखाली स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंबेडकरवादी नेत्यांवर सुजात आंबेडकर यांनी जळजळीत प्रहार केला. त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सांगितलं की, गणराज्य एकतेची खरी सुरुवात दाखवायची असेल. तर सर्वांनी आपले पक्ष विसर्जित करून वंचित बहुजन आघाडीत एकवटावे. त्यांच्या मते, फक्त फोटोंच्या फ्लॅशमध्ये दिसणारी एकता म्हणजे विचारांची क्रांती नाही.

मुंबईच्या आझाद मैदानात पाच पक्ष आणि दहा नेते एकत्र येऊनही दोनशे लोक न जमवू शकणं म्हणजे विचारांवरील जनतेचा विश्वास हरवलेला असल्याचं द्योतक आहे. उलट, नांदुराच्या मैदानात हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या जनसमुदायाने दाखवून दिलं की, विचारांवर चालणाऱ्या पक्षांनाच लोकांची खरी साथ मिळते. सुजात आंबेडकर यांनी पुढे सांगितलं की, वंचित बहुजन आघाडी जमिनीवरील कार्यकर्त्यांच्या घामातून उभं राहिलेलं आंदोलन आहे.

Bihar Elections : प्रशांत किशोर यांची निवडणुकीतून माघार

स्थानिक पातळीवर समाजाच्या विचारांना आकार देत, प्रत्येक नगरपरिषदेच्या रणांगणात विजय मिळवणं हेच पुढचं ध्येय आहे. त्यांच्या भाषणातील प्रत्येक ओळीत एक चेतना होती. विचारांनी समाज बदलतो आणि समाजाने नेते घडतात. आज नांदुराने दाखवलेली ताकद ही एका नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात आहे. वंचितीचा हा प्रवाह थांबवणं आता कोणाच्याही हातात राहिलेलं नाही.

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!