देश

अमित शाह यांच्या विरोधात Vanchit आघाडीचे आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा Rajya Sabha मध्ये अवमान

Author

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आता वंचित बहुजन आघाडीनं देखील आवाज बुलंद केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी Rajya Sabha येथे अवमानजनक वक्तव्य केलं. या वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसनं संसंदेबाहेर आंदोलन केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे या आंदोलनात सहभागी झालेत. काँग्रेसच्या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीनं देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे.

शाह यांनी केलेल्या या विधानाच्या निषेधार्थ राज्यात अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. मुंबई येथील महानगर पालिकेच्या इमारतीच्या समोर वंचितच्या कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार आंदोलन केले. यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते. (Prakash Ambedkar Targets bjp at Mumbai) या आंदोलनावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आंबेडकर यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

Narendra Modi यांना इशारा

आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला. बाबासाहेब आंबेडकरांना असे संबोधल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. पण यातून तुमचे चारित्र्य समोर येत आहे. अमित शाह यांनी या वक्तव्यानंतर मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यावा. सरकारने हे न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. कॉंग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला असे भाजप सांगते. आपण मोंदीचा प्रश्न करणार आहे. मध्य मुंबई मधील 1952 च्या लोकसभा निवडणुकीत आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही? हे सांगा.

नरेंद्र भोंडेकरांसाठी Bhandara मध्ये शिंदे पितापुत्र फ्रंटफूटवर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि डाव्यांनी एकत्र येत डॉ. आंबेडकरांना मध्य मुंबईच्या निवडणुकीत पराभूत केले होते. हा इतिहास देखील भाजप आणि मोदी यांनी सांगायला हवा. अमित शाह यांना विरोध करणाऱ्या सर्वांचे आपण स्वागत करतो. लोकांनी त्यांच्या विरोधात लाखोंच्या संख्येने बाहेर पडावे. आमचा संताप जास्त आहे. परंतु आम्ही शांततेने आंदोलन करीत आहोत. भविष्यात आमचा मोर्चा संतापाने भरलेला असेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यसभेमध्ये बोलताना अमित शाह ‘आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. त्यांनी एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते’ असं म्हटलं होतं.

चव्हाणांचीही टीका

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील ते विधान हे अत्यंत दुर्दैवीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती द्वेषपूर्ण भावना भरलेली आहे, याचेच त्यातून प्रदर्शन झाल्याचा निशाणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे माध्यमांशी बोलताना साधला. भाजपाने वैचारिक हल्ला करावा. मात्र, त्यांची द्वेषपूर्ण वक्तव्यातून समाजात विभाजन करण्याची प्रवृत्ती आहे. लोकसभेला मोदींनी मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचे सांगत भाजपाला देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायची असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!